पवईतील आर ए स्टुडिओमध्ये थरार, शूटिंगच्या नावाखाली ओलीस ठेवलेल्या १७ मुलांची सुटका, एन्काउंटरमध्ये आरोपी ठार

मुंबई : पवई परिसरात घडलेल्या एका भीषण घटनेने संपूर्ण मुंबई हादरली. ‘शूटिंग ऑडिशन’च्या नावाखाली सुरू असलेल्या उपक्रमादरम्यान आर ए स्टुडिओमध्ये एका व्यक्तीने १७ मुला-मुलींसह एका ज्येष्ठ आणि एक सामान्य नागरिकाला ओलीस ठेवले होते. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत ओलीस ठेवलेल्या सर्वांची सुखरूप सुटका केली. यावेळी झालेल्या चकमकीत अर्थात एन्काउंटरमध्ये गंभीर जखमी झालेल्या आरोपी रोहित आर्यचा नंतर मृत्यू झाला.


पवई परिसरातील एका स्टुडिओमध्ये एका वेब सीरिजच्या ऑडिशनसाठी सुमारे १०० पेक्षा जास्त मुलं आली होती. आरोपी रोहित आर्यने यापैकी बहुतांश मुलांना घरी पाठवून फक्त १७ मुले आणि २ नागरिकांना ओलीस ठेवले. काही वेळातच त्याने स्वतःचा व्हिडीओ प्रसारित करत आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा केला आणि प्रशासनाशी संवादाची मागणी केली.


घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि एनएसजी कमांडो घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आरोपीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती बिघडत गेल्याने अखेर गोळीबार करण्यात आला. एअरगन सोबत ठेवून अनेकांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यने पोलिसांवर गोळी झाडली. पोलिसांनीही प्रत्युत्तरात गोळीबार केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी झाडलेली गोळी आर्यच्या छातीत लागली आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


रोहित आर्य हा पुण्याचा रहिवासी असून, त्याने यापूर्वी शासनाकडे थकबाकीबाबत तक्रार केली होती. एका शाळेच्या दुरुस्तीचे पैसे न दिल्याचा आरोप त्याने केला होता. याच प्रकरणात तो काही महिन्यांपासून उपोषण करत होता.


आरोपीने एका व्हिडीओमध्ये सांगितले होते की, “मला या मुलांना काहीच करायचं नाही. मात्र मला काही लोकांशी बोलायचं आहे, चर्चा करायची आहे, माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची आहेत. मला कोणी रोखण्याचा, इथे येण्याचा प्रयत्न केला तर या मुलांबरोबर काही वाईट घडलं तर त्यास मी जबाबदार नसेन.”


दरम्यान, पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे १९ निष्पाप जीव सुखरूप सुटले असून परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात आणि पालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

Comments
Add Comment

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

केंद्रीय मंत्रिमंडळाची नाशिक-सोलापूर-अक्कलकोट या सहा पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी

नवी दिल्ली :  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ

२९ महापालिकांच्या निवडणुकीत तब्बल ३३ हजार ६०६ अर्ज

एका जागेसाठी सरासरी १२ उमेदवार रिंगणात; पुण्यात सर्वाधिक चुरस, मुंबईत अडीच हजार उमेदवार मुंबई : राज्यातील २९

प्रहार विशेष: आता सोनेच काय चांदीवर कर्ज मिळणार! तारण कर्जाची प्रकिया, नियमावली, फायदा, भविष्य, पुढे काय? तज्ञांची माहिती वाचाच....

मोहित सोमण सोन्यावर कर्ज मिळते हे तुम्ही ऐकले असेल, सोने तारण हे समाजात लोकप्रिय असेल पण आतापर्यंत चांदीवर कर्ज

मराठा समाजासाठी महत्त्वाची बातमी, शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ

मुंबई : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी पुराव्यांची प्रशासकीय छाननी करणाऱ्या शिंदे समितीला सहा

रामदास आठवले यांचे बंड २४ तासांत झाले थंड - मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; भाजप-शिवसेना कोट्यातून १२ जागा मिळणार असल्याचा दावा

मुंबई : मुंबई पालिका निवडणुकीच्या जागावाटपात सन्मानजनक वागणूक न मिळाल्याने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत