दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाभ्यासाचे महत्त्व आणखी वाढले आहे. हा योगाभ्यास करण्यासाठी क्लासला जाणे शक्य नसेल तर काळजी करू नका. आता तुम्ही घरच्या घरीच काही आसनं करून तणावमुक्त राहू शकता. ते कसं ? चला बघुया...


दररोज काही तास या आसनांसाठी दिल्यास शरीरावरील ताण कमी होतो आणि मन प्रसन्न राहते. चिंता, अस्वस्थता आणि मानसिक थकवा कमी करून दिवस अधिक सकारात्मक करू शकता.


कॅट काऊ पोज : मणक्याचा तणाव कमी करण्यासाठी उत्तम उपाय, या आसनात पाठीचा कणा वर खाली हलवून शरीरातील ताण कमी होतो. श्वसनावर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवले आणि लयीत हालचाल केली तर रक्ताभिसरण सुधारते आणि मज्जासंस्थेला आवश्यक आराम मिळतो शिवाय लवचिकता वाढते.



बालासन : मनाला विश्रांती देणारे असं आसन. गुडघ्यांवर बसून हात पुढे ठेवावेत. हे असं शरीर आणि मन असा दोन्हींना शांती देते. पाठीचा ताण कमी होतो. खांदे सैलावतात आणि मनावरील ताण दूर होतो.



शवासन : संपूर्ण शरीराच्या विश्रांतीसाठी सर्वोत्तम आसन. पाठीवर झोपून शरीर शिथिल करा आणि श्वासावर लक्ष केंद्रत करा. हे आसन मन शांत ठेवण्यासाठी आणि स्थिरतेसाठी अतिशय प्रभावी आहे.



लेग्ज-अप-द-वॉल पोझ : एनर्जी साठवण्यास मदत करणारे आसन, पाठीवर झोपून पाय भिंतीवर टेकवण्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो, हे आसन शारीरिक आणि मानसिक थकवा कमी करण्यासाठी मदत करतं .



पश्चिमोत्तानासन : हे आसन केल्याने पाठीचा कणा आणि हॅमस्ट्रिंग्स ताणते, यामुळे मानसिक शांतता मिळते. पचनशक्ती सुधारते.



वृक्षासन : हे आसन आंतरिक शांती आणि शांतता प्रदान करत, या आसनामुळे एकाग्रता वाढते आणि मानसिक संतुलन सुधारते. हे आसन स्नायूंना मजबूत करते, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि मानसिक स्थैर्य मिळते.


Comments
Add Comment

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या