लग्नात नववधूने फक्त तीनच सोन्याचे दागिने परिधान करावे, पंचायतीचे निर्देश

उत्तराखंड : दिवसेंदिवस सोन्याच्या आणि चांदीच्या किमती या गगनाला भिडत आहेत. भारतीय परंपरेनुसार आपण बहुतेक सणांमध्ये, लग्नात दागिने घालतोच पण हल्ली दागिने खरेदी सर्व सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. हिच एकूण परिस्थिती लक्षात घेऊन भारतातील एका गावाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे दागिन्यांवर खर्च कमी होईल.


उत्तराखंड मधील अनुसूचित जनजाती क्षेत्र जौनसार भागातील एका पंचायतीनं सोडलेला हे फर्मान महिलांनी किती सोन्याचे दागिने घालावेत याबाबत आहे. या पंचायतीनं लग्न किंवा इतर समारंभात तीन पेक्षा जास्त सोन्याचे दागिने घालण्यावर बंदी घातली आहे.


महिलांनी सोन्याचे दागिने घालण्याबाबतचा हा नियम कंजाड आणि इंद्रोली गावात लागू करण्यात आला आहे. महिलांना कानातील झुमके, नाकातील नथ आणि मंगळसूत्र हे तिचे सोन्याचे दागिने घालण्याची सवलत देण्यात आली आहे. दोन गावांच्या संयुक्त पंचायतीनं या नियमांचं उल्लंघन करण्याऱ्या संबंधित व्यक्तीला ५० हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. दरम्यान कंदाड येथील रहिवासी असलेल्या अर्जुन सिंह यांनी सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे हा निर्णय घेतल्याचं सांगितलं.


लग्न आलं की महिला सोन्याच्या दागिन्यांचा आग्रह धरतात. पण सोन्याचे दार गगनाला भिडले आहेत. त्यामुळे कुटुंबात वाद होऊ नये यासाठी पंचायतीने विचारपूर्वक दागिन्यांवर बंधन आणणारा निर्णय घेतला आहे. पंचायत लग्नातील इतर खर्च आणि मद्य अर्थात दारूवर होणारा खर्च यावर नियंत्रण आणण्याबाबतही विचार करत आहे. अनेक महिलांनी पंचायतीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Accident : आंध्र प्रदेशात खासगी ट्रॅव्हलची डंपरला जोरदार धडक; १३ जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशातील मार्कापुरम जिल्ह्यात आज पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली आहे. रायवरमजवळ एका खासगी

PM Narendra Modi : जगात मोदींचीच हवा! पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत.

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे