लग्नात नववधूने फक्त तीनच सोन्याचे दागिने परिधान करावे, पंचायतीचे निर्देश

उत्तराखंड : दिवसेंदिवस सोन्याच्या आणि चांदीच्या किमती या गगनाला भिडत आहेत. भारतीय परंपरेनुसार आपण बहुतेक सणांमध्ये, लग्नात दागिने घालतोच पण हल्ली दागिने खरेदी सर्व सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. हिच एकूण परिस्थिती लक्षात घेऊन भारतातील एका गावाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे दागिन्यांवर खर्च कमी होईल.


उत्तराखंड मधील अनुसूचित जनजाती क्षेत्र जौनसार भागातील एका पंचायतीनं सोडलेला हे फर्मान महिलांनी किती सोन्याचे दागिने घालावेत याबाबत आहे. या पंचायतीनं लग्न किंवा इतर समारंभात तीन पेक्षा जास्त सोन्याचे दागिने घालण्यावर बंदी घातली आहे.


महिलांनी सोन्याचे दागिने घालण्याबाबतचा हा नियम कंजाड आणि इंद्रोली गावात लागू करण्यात आला आहे. महिलांना कानातील झुमके, नाकातील नथ आणि मंगळसूत्र हे तिचे सोन्याचे दागिने घालण्याची सवलत देण्यात आली आहे. दोन गावांच्या संयुक्त पंचायतीनं या नियमांचं उल्लंघन करण्याऱ्या संबंधित व्यक्तीला ५० हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. दरम्यान कंदाड येथील रहिवासी असलेल्या अर्जुन सिंह यांनी सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे हा निर्णय घेतल्याचं सांगितलं.


लग्न आलं की महिला सोन्याच्या दागिन्यांचा आग्रह धरतात. पण सोन्याचे दार गगनाला भिडले आहेत. त्यामुळे कुटुंबात वाद होऊ नये यासाठी पंचायतीने विचारपूर्वक दागिन्यांवर बंधन आणणारा निर्णय घेतला आहे. पंचायत लग्नातील इतर खर्च आणि मद्य अर्थात दारूवर होणारा खर्च यावर नियंत्रण आणण्याबाबतही विचार करत आहे. अनेक महिलांनी पंचायतीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Comments
Add Comment

Uttar Pradesh: तीन बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला वडिलांचा फोन जप्त

उत्तर प्रदेशा: गाझियाबादमधील एका घराच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या तीन बहिणींच्या

Bharat Bandh: केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

मुंबई : विविध कामगार संघटनांनी आज, गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर

Crime: प्रिन्सिपल सुनेसोबत सासऱ्याचे नको ते प्रकार, नात्याला काळिमा फासणारी घटना समोर

मुंबई: नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या एका प्रतिष्ठित

Vande Mataram : शाळांपासून संसदेपर्यंत आता संपूर्ण 'वंदे मातरम्' घुमणार! केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, सर्व ६ कडवी आता अनिवार्य

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची ठिणगी टाकणाऱ्या 'वंदे मातरम्' या गीताचा सन्मान वाढवण्यासाठी

Sunetra Pawar : दिल्लीत राजकीय खलबतं! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोदी-शाहांच्या भेटीला, तर रोहित पवारही राजधानीत

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र आज मुंबईहून देशाची राजधानी दिल्लीत सरकले आहे. राज्याच्या

Rohit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात नव्हे घातपात!

- रोहित पवार यांनी व्यक्त केला संशय; पूर्व विदर्भातील नेत्याच्या फाईलवर सही करण्यास उशीर झाल्याने करावा लागला