लग्नात नववधूने फक्त तीनच सोन्याचे दागिने परिधान करावे, पंचायतीचे निर्देश

उत्तराखंड : दिवसेंदिवस सोन्याच्या आणि चांदीच्या किमती या गगनाला भिडत आहेत. भारतीय परंपरेनुसार आपण बहुतेक सणांमध्ये, लग्नात दागिने घालतोच पण हल्ली दागिने खरेदी सर्व सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. हिच एकूण परिस्थिती लक्षात घेऊन भारतातील एका गावाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे दागिन्यांवर खर्च कमी होईल.


उत्तराखंड मधील अनुसूचित जनजाती क्षेत्र जौनसार भागातील एका पंचायतीनं सोडलेला हे फर्मान महिलांनी किती सोन्याचे दागिने घालावेत याबाबत आहे. या पंचायतीनं लग्न किंवा इतर समारंभात तीन पेक्षा जास्त सोन्याचे दागिने घालण्यावर बंदी घातली आहे.


महिलांनी सोन्याचे दागिने घालण्याबाबतचा हा नियम कंजाड आणि इंद्रोली गावात लागू करण्यात आला आहे. महिलांना कानातील झुमके, नाकातील नथ आणि मंगळसूत्र हे तिचे सोन्याचे दागिने घालण्याची सवलत देण्यात आली आहे. दोन गावांच्या संयुक्त पंचायतीनं या नियमांचं उल्लंघन करण्याऱ्या संबंधित व्यक्तीला ५० हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. दरम्यान कंदाड येथील रहिवासी असलेल्या अर्जुन सिंह यांनी सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे हा निर्णय घेतल्याचं सांगितलं.


लग्न आलं की महिला सोन्याच्या दागिन्यांचा आग्रह धरतात. पण सोन्याचे दार गगनाला भिडले आहेत. त्यामुळे कुटुंबात वाद होऊ नये यासाठी पंचायतीने विचारपूर्वक दागिन्यांवर बंधन आणणारा निर्णय घेतला आहे. पंचायत लग्नातील इतर खर्च आणि मद्य अर्थात दारूवर होणारा खर्च यावर नियंत्रण आणण्याबाबतही विचार करत आहे. अनेक महिलांनी पंचायतीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Comments
Add Comment

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान