लग्नात नववधूने फक्त तीनच सोन्याचे दागिने परिधान करावे, पंचायतीचे निर्देश

उत्तराखंड : दिवसेंदिवस सोन्याच्या आणि चांदीच्या किमती या गगनाला भिडत आहेत. भारतीय परंपरेनुसार आपण बहुतेक सणांमध्ये, लग्नात दागिने घालतोच पण हल्ली दागिने खरेदी सर्व सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. हिच एकूण परिस्थिती लक्षात घेऊन भारतातील एका गावाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे दागिन्यांवर खर्च कमी होईल.


उत्तराखंड मधील अनुसूचित जनजाती क्षेत्र जौनसार भागातील एका पंचायतीनं सोडलेला हे फर्मान महिलांनी किती सोन्याचे दागिने घालावेत याबाबत आहे. या पंचायतीनं लग्न किंवा इतर समारंभात तीन पेक्षा जास्त सोन्याचे दागिने घालण्यावर बंदी घातली आहे.


महिलांनी सोन्याचे दागिने घालण्याबाबतचा हा नियम कंजाड आणि इंद्रोली गावात लागू करण्यात आला आहे. महिलांना कानातील झुमके, नाकातील नथ आणि मंगळसूत्र हे तिचे सोन्याचे दागिने घालण्याची सवलत देण्यात आली आहे. दोन गावांच्या संयुक्त पंचायतीनं या नियमांचं उल्लंघन करण्याऱ्या संबंधित व्यक्तीला ५० हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे. दरम्यान कंदाड येथील रहिवासी असलेल्या अर्जुन सिंह यांनी सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे हा निर्णय घेतल्याचं सांगितलं.


लग्न आलं की महिला सोन्याच्या दागिन्यांचा आग्रह धरतात. पण सोन्याचे दार गगनाला भिडले आहेत. त्यामुळे कुटुंबात वाद होऊ नये यासाठी पंचायतीने विचारपूर्वक दागिन्यांवर बंधन आणणारा निर्णय घेतला आहे. पंचायत लग्नातील इतर खर्च आणि मद्य अर्थात दारूवर होणारा खर्च यावर नियंत्रण आणण्याबाबतही विचार करत आहे. अनेक महिलांनी पंचायतीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच