'क्यों की सास भी कभी बहू थी-पर्व २' लवकरच होणार बंद! चाहत्यांची भावनिक प्रतिक्रिया

मुंबई: टीव्ही जगतातील चर्चेत असलेली एकता कपूरची लोकप्रिय मालिका ‘क्यों की सास भी कभी बहू थी – सीझन 2’ सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही मालिका टीआरपीच्या यादीत वरच्या स्थानावर असली तरी, आता अशी चर्चा आहे की ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.


सोशल मीडियावरील एका फॅन पेजवरून ही माहिती समोर आली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की,या मालिकेचे केवळ २०० भाग प्रसारित होणार आहेत. एकता कपूरने मालिकेच्या सुरुवातीलाच सांगितले होते की, जर प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला, तरच मालिकेच्या भागांची संख्या वाढवली जाईल. मात्र, अपेक्षेइतकी लोकप्रियता न मिळाल्याने आता या मालिकेचा शेवट जवळ आल्याचे सांगितले जात आहे.




या बातमीमुळे मालिकेचे चाहते निराश झाले असून त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया भावनिक प्रतिक्रीया दिल्या आहेत. तर काही चाहत्यांनी म्हटले आहे की, कथा ताणून मालिका बिघडवण्यापेक्षा योग्य वेळी सुंदर शेवट करणे चांगले आहे. मालिकेच्या निर्मात्यांकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, ‘क्यों की सास भी कभी बहू थी’ या मालिकेचा निरोप निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम दिशा वकानीच्या वडिलांचं निधन

मुंबई: टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील दयाबेनच्या भूमिकेसाठी ओळखली

Dhurandhar 2 ; Virushka : वीरूष्काला पडली धुरंधर २ ची भुरळ; इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत.....

मुंबई : धुरंधर या चित्रपटाने सर्वानाच भुरळ पाडली आहे. पहिल्या भागाने जोरदार कमाई करत. भारतीयांच्या लोकांच्या

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी

Ramayana Movie : रामायणमध्ये भूमिका साकारणार बिग बींचा जावई, 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : रामायण ( Ramayana ) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून रामायणमधील रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) चा पहिला लूक पाहिल्यानंतर

Gaurav More Marriage: हास्यजत्रेमधील 'फिल्टर पाड्याचा बच्चन' गौरव मोरे अडकला विवाहबंधनात, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई : आपल्या कॉमेडीनं संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा त्याचबरोबर फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून