'क्यों की सास भी कभी बहू थी-पर्व २' लवकरच होणार बंद! चाहत्यांची भावनिक प्रतिक्रिया

मुंबई: टीव्ही जगतातील चर्चेत असलेली एकता कपूरची लोकप्रिय मालिका ‘क्यों की सास भी कभी बहू थी – सीझन 2’ सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही मालिका टीआरपीच्या यादीत वरच्या स्थानावर असली तरी, आता अशी चर्चा आहे की ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.


सोशल मीडियावरील एका फॅन पेजवरून ही माहिती समोर आली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की,या मालिकेचे केवळ २०० भाग प्रसारित होणार आहेत. एकता कपूरने मालिकेच्या सुरुवातीलाच सांगितले होते की, जर प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला, तरच मालिकेच्या भागांची संख्या वाढवली जाईल. मात्र, अपेक्षेइतकी लोकप्रियता न मिळाल्याने आता या मालिकेचा शेवट जवळ आल्याचे सांगितले जात आहे.




या बातमीमुळे मालिकेचे चाहते निराश झाले असून त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया भावनिक प्रतिक्रीया दिल्या आहेत. तर काही चाहत्यांनी म्हटले आहे की, कथा ताणून मालिका बिघडवण्यापेक्षा योग्य वेळी सुंदर शेवट करणे चांगले आहे. मालिकेच्या निर्मात्यांकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, ‘क्यों की सास भी कभी बहू थी’ या मालिकेचा निरोप निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

ऐन रिलीजच्या तोंडावर केरळ स्टोरी २ सिनेमात सेन्सॉर बोर्डाने सुनावले चक्क १६ बदल

मुंबई : लव्ह जिहाद या मुद्द्यावर आधारित असलेला केरळ स्टोरी या सिनेमाचा दुसरा भाग येत्या शुक्रवारी २७

Sonalee Kulkarni Brother Death: सोनाली कुलकर्णीच्या भावाचं निधन; अभिनेत्रीची भावूक पोस्ट, म्हणाली...

मुंबई: मराठी सिनेसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोनाली

Bhooth Bangla : ‘भूत बंगला’चा नवा पोस्टर प्रदर्शित; अक्षय कुमारकडून वारसा आणि धमाल मस्तीची झलक

मुंबई: ‘भूत बंगला’ हा २०२६ मधील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट ठरत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे बॉलिवूडचा

संजय लीला भन्साळी मागील चार दशकांतले सर्वात महान दिग्दर्शक : रणबीर कपूर

मुंबई : आज संजय लीला भन्साळी यांचा वाढदिवस असल्याने, रणबीर कपूर यांनी या प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शकाला

Bigg Boss Marathi Season 6 Sachin Kumawat: 'बिग बॉस'मराठीच्या घराचा निरोप घेतल्यानंतर खान्देश किंग सचिन कुमावतची पहिली पोस्ट समोर; काय म्हणाला?

मुंबई: 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझनची रंगत वाढत चालली आहे. या सीझनमधील स्पर्धकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळते.

‘द केरल स्टोरी २ ’च्या आगमनापूर्वी दिल्लीतील भावनिक पत्रकार परिषद; पीडितांनी सांगितल्या आपल्या खऱ्या कहाण्या

मुंबई : ‘द केरल स्टोरी २  – गोज बियॉन्ड’च्या रिलीजपूर्वी चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिल्लीमध्ये एक पत्रकार