'क्यों की सास भी कभी बहू थी-पर्व २' लवकरच होणार बंद! चाहत्यांची भावनिक प्रतिक्रिया

मुंबई: टीव्ही जगतातील चर्चेत असलेली एकता कपूरची लोकप्रिय मालिका ‘क्यों की सास भी कभी बहू थी – सीझन 2’ सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही मालिका टीआरपीच्या यादीत वरच्या स्थानावर असली तरी, आता अशी चर्चा आहे की ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.


सोशल मीडियावरील एका फॅन पेजवरून ही माहिती समोर आली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की,या मालिकेचे केवळ २०० भाग प्रसारित होणार आहेत. एकता कपूरने मालिकेच्या सुरुवातीलाच सांगितले होते की, जर प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला, तरच मालिकेच्या भागांची संख्या वाढवली जाईल. मात्र, अपेक्षेइतकी लोकप्रियता न मिळाल्याने आता या मालिकेचा शेवट जवळ आल्याचे सांगितले जात आहे.




या बातमीमुळे मालिकेचे चाहते निराश झाले असून त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया भावनिक प्रतिक्रीया दिल्या आहेत. तर काही चाहत्यांनी म्हटले आहे की, कथा ताणून मालिका बिघडवण्यापेक्षा योग्य वेळी सुंदर शेवट करणे चांगले आहे. मालिकेच्या निर्मात्यांकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, ‘क्यों की सास भी कभी बहू थी’ या मालिकेचा निरोप निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे.

Comments
Add Comment

हाय-प्रोफाइल लग्नातही करण जोहर जेवत नाही; कारण ऐकून बसाल थक्क

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते करण जोहर आपल्या चित्रपटांसोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही

दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकातील सहावे पुष्प भेटीला

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत त्यांच्या

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर

ज्येष्ठ संगीतकार ओ. पी नय्यर यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मंत्री आशिष शेलार यांची घोषणा; गायिका उत्तरा केळकर यांना मोहम्मद रफी पुरस्कार मुंबई: हिंदीमधील अजरामर

‘एकाकी’मधील जॉनर बदलासाठी आशिष चंचलानीचे एस.एस. राजामौलींने केले कौतुक

आशिष चंचलानी, जे भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल स्टार्सपैकी एक आहेत आणि ज्यांची देशभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे,

साऊथचे सुपरस्टार 'रजनीकांत' चे काय आहे खरे नाव ?

रजनीकांत म्हणून ओळखले जाणारे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांमद्धे नावाजलेले असे ,'थलायवा' अर्थात रजनीकांत