मोबाईल ग्राहकवाढीत जिओ आघाडीवर; एअरटेल दुसऱ्या क्रमांकावर

रायगड : महाराष्ट्रात मोबाईल ग्राहकांची संख्या सातत्याने वाढत असून, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओने सर्वाधिक म्हणजे 1.57 लाख नवीन ग्राहकांची भर घातली आहे. तर एअरटेलने 52 हजार 255, वोडाफोन-आयडियाने 50 हजार 504, आणि बीएसएनएलने 34 हजार 610 नवीन ग्राहक जोडले असल्याची माहिती टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) च्या ताज्या अहवालात देण्यात आली आहे.

जिओने मागील तीन महिन्यांपासून आपल्या ग्राहकसंख्येत सातत्याने वाढ नोंदवली आहे. उच्च गतीचे इंटरनेट, स्वस्त प्लॅन आणि विस्तारित कव्हरेजमुळे ग्रामीण भागातदेखील जिओची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे. एअर फायबर सेवांनाही वाढता प्रतिसाद:

ट्रायच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील सक्रिय जिओ एअर फायबर वापरकर्त्यांची संख्या 5,52,265 इतकी झाली आहे. तुलनेत एअरटेलचे सक्रिय फायबर ग्राहक 2,00,813 इतके आहेत. जलद इंटरनेट स्पीड, ऑनलाईन शिक्षण आणि घरून काम (Work From Home) संस्कृतीमुळे या सेवेची मागणी वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्र हे दूरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य राज्य ठरत असून, डिजिटल पायाभूत सुविधा वाढविण्यात खाजगी कंपन्यांचा मोठा वाटा असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

लोकल प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांचा निर्णय; स्थानकांवर बॅगांची होणार तपासणी

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल रेल्वेत प्रवाशाच्या हत्येनंतर रेल्वे पोलिसांनी

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर

मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची