सुरतहून साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाचा घाला! तिघांचा मृत्यू तर चारजण जखमी

नाशिक: सुरतहून शिर्डीच्या साईबाबांचे दर्शना घेण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला केला. काल मध्यरात्री दीडच्या सुमारास फॉर्च्युनर या चारचाकी वाहनाने शिर्डीला येत असताना वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा अपघात एरंडगाव शिवारात नाशिक महामार्गावर झाला असून यात तिघांचा जागीच मृत्यू तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत.


अपघातातील मृत व्यक्तींमध्ये प्रणव अनुरभाई देसाई (वय ४०), पलक अजयभाई कपाडिया (वय ३५), सुरेशचंद्र कबीराज साहू (वय ३५) यांचा समावेश आहे. तर जखमींमध्ये विष्णू मनोजकुमार छकवाला (वय २८), बिपीन नवीनचंद्र राणा (वय ४९), सागर निपुण शहा (वय ३०), विक्रम महेंद्रभाई उसवाल (वय ४२) यांचा समावेश आहे. अपघातातील सर्व व्यक्ती गुजरातच्या सुरत शहरात स्थायिक आहेत. सध्या जखमींवर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.




या प्रकरणी तालुका पोलिसांत नीरज अशोककुमार कापडिया (रा. जदाखाडी मैधरपुरा, सुरत) यांच्या फिर्यादीवरून चालक सागर निपुण शाह याच्याविरुद्ध भरधाव वेगाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक करीत आहेत.

Comments
Add Comment

‘इंडियन आयडॉल : यादों की प्लेलिस्ट’ ला मराठी मनोरंजन क्षेत्रातील प्रियदर्शिनी इंदळकर आणि नम्रता संभेराव यांचा भरभरून प्रतिसाद!

मुंबई: सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन, भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मनोरंजन वाहिन्यांपैकी एक असून पुन्हा एकदा

'क्यों की सास भी कभी बहू थी-पर्व २' लवकरच होणार बंद! चाहत्यांची भावनिक प्रतिक्रिया

मुंबई: टीव्ही जगतातील चर्चेत असलेली एकता कपूरची लोकप्रिय मालिका ‘क्यों की सास भी कभी बहू थी – सीझन 2’ सध्या

वायंगणी कांबळीवाडी समुद्रकिनारी कुजलेल्या अवस्थेत आढळला भला मोठा व्हेल मासा...

वेंगुर्ले: वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी कांबळीवाडी समुद्रकिनारी आज सकाळी भला मोठा व्हेल मासा कुजलेल्या

बंगळुरूतील धक्कादायक घटना, जोडप्याने भरधाव वेगाने पाठलाग केला आणि...

बंगळुरू : कर्नाटकमध्ये बंगळुरू येथे एक धक्कादायक घटना घडली. रस्त्यावरुन वेगाने जात असलेल्या एका कारला एका

कलर्स मराठीच्या प्रेक्षकांना मिळणार नव्या मालिकेची मेजवानी! सुचित्रा बांदेकर, विनायक माळी घेऊन येत आहेत ‘मच्छीका पानी’

मुंबई: मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर घालण्यासाठी मराठीतील दैनंदिन मालिका महत्त्वाची भूमिका निभावतात.

दिवाळी हंगामात लालपरीची ३०१ कोटींची कमाई

चांगले उत्पन्न आणल्याबद्दल मंत्री प्रताप सरनाईक यांच्यांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक मुंबई : यावर्षी दिवाळी