पवईत शूटिंगच्या बहाण्याने २५ मुलांना खोलीत डांबले, अखेर सुरक्षा पथकाने केला गोळीबार

मुंबई : मुंबईतल्या पवई परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शूटिंगच्या नावाखाली गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऑडिशनच्या ठिकाणी एका व्यक्तीने अचानक अनेक मुलांना ओलीस ठेवत व्हिडीओद्वारे आपली भूमिका मांडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, २५ मुला-मुलींना त्याने बंदी बनवले असून पोलिस आणि एनएसजी कमांडो घटनास्थळी दाखल झाले आहेत.


सदर आरोपीचं नाव रोहित आर्य असं असून त्याने आपल्या व्हिडीओ संदेशात म्हटलं आहे की, “मी दहशतवादी नाही. माझ्या काही साध्या मागण्या आहेत. मी आत्महत्या करण्याऐवजी मुलांना ओलीस ठेवलं आहे, कारण मला काही लोकांशी संवाद साधायचा आहे.”


रोहित आर्यने पुढे म्हटलं की, “मी पैशांची मागणी केलेली नाही. माझं उपोषण १ मेपासून सुरू आहे. अनेकांकडे गेलो, अनेक वेळा प्रयत्न केले, पण माझ्या प्रश्नांकडे कोणी लक्ष दिलं नाही. त्यामुळे आज मी तीव्र उपोषण सुरू केलं आहे. आता मी पाणी सुद्धा घेणार नाही. सरकार आणि संबंधित लोकांनी या प्रश्नाचं गांभीर्य ओळखावं, नाहीतर पुढचं पाऊल काय असेल हे सांगू शकत नाही.” त्याने पुढे सांगितले की, “हा प्रश्न फक्त माझा नाही, अनेक लोकांचा आहे. मला समाधानकारक उत्तर आणि संवाद हवा आहे.” सध्या पोलिस, अग्निशमन दल आणि एनएसजी कमांडोनी परिसराला वेढा दिला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अखेरच्या वृत्तानुसार सुरक्षा पथकाने गोळीबार केला. या गोळीबारात मुलांना डांबून ठेवणारा जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

Comments
Add Comment

Vijayrao Deshmukh passes away: प्रख्यात शिवकथाकार विजयराव देशमुख यांचं निधन, मुख्यमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

मुंबई: धर्मभास्कर प. पू. सद्गुरूदास महाराज उपाख्य शिवकथाकार विजयराव देशमुख यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

'गिल्बर्ट हिल नियम उल्लंघन प्रकरणी अहवाल सादर करा'

मुंबई : गिल्बर्ट हिल हा परिसर पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील व महत्त्वपूर्ण आहे. हा भाग हरित क्षेत्रात

कांदळवन बफर झोनमधील भराव प्रकरणी सरकारी अभियोक्त्यांच्या सूचनांनुसार कारवाई

मुंबई : क्षेत्र विकासाच्या कामांदरम्यान काही खाजगी विकासकांनी कांदळवनापासून ५० मीटर अंतराच्या बफर झोनमध्ये

मुंबई शहर प्लास्टिकमुक्त करणार

उपमहापौर संजय घाडी यांची घोषणा मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई शहरामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्यास