भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताने दमदार सुरुवात करताना १० षटकांत फक्त १ विकेट गमावून ९७ धावा केल्या होत्या, मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा मैदानावर हजेरी लावली आणि सामना पुढे सुरू होऊ शकला नाही.


भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि सलामीवीर शुभमन गिल यांनी प्रभावी कामारी केली. दोघांनी मिळून दुसऱ्या विकेटसाठी ३५ चेंडूत ६२ धावा जोडल्या. सूर्यकुमारने आक्रमक फलंदाजी करत २४ चेंडूत ३९ धावा, तर गिलने आकर्षक फटकेबाजीसह २० चेंडूत ३७ धावा काढल्या. त्यांच्या या भागीदारीमुळे भारताने ऑस्ट्रेलियावर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण केला होता.


त्याआधी, युवा फलंदाज अभिषेक शर्माने चार चौकारांसह १४ चेंडूत १९ धावा केल्या, पण तो नाथन एलिसच्या गोलंदाजीवर बाद झाला. विकेट गमावल्यानंतरही भारताने आक्रमक खेळ कायम ठेवत फलंदाजीवर नियंत्रण मिळवले होते.


पावसामुळे सामन्याच्या सुरुवातीला खेळ उशिरा सुरू झाला आणि सामना २० ऐवजी १८ षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आला होता. मात्र हवामान पुन्हा बिघडल्याने खेळ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.


ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता, परंतु भारतीय फलंदाजांनी त्यांच्या गोलंदाजांना कोणताही वाव दिला नाही.


सूर्यकुमार आणि गिलच्या जबरदस्त फटकेबाजीने भारताने मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती, पण अखेर पावसाने सामन्याचा रंग उडवला. भारताने मिळवलेली उत्कृष्ट सुरुवात व्यर्थ ठरली, आता दोन्ही संघांना मालिकेतील पुढील सामन्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी२० सामना शुक्रवार ३१ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी १:४५ वाजता सुरू होईल.

Comments
Add Comment

भारतीय संघ कसोटीत अपयशी; टी - २० त ‘ब्लॉकबस्टर’!

मुंबई  : भारतीय क्रिकेट संघासाठी २०२५ हे वर्ष संमिश्र यश देणारे ठरले. या वर्षात भारताने १० कसोटी, १४ वनडे आणि २२

पाकिस्तानच्या नक्वीचा भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंनी केला अपमान

मुंबई  : जेतेपदाच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने समीर मिन्हासच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर ३४७

भारत दौऱ्यातून मेस्सीला ८९ कोटींची कमाई, भारताला कररूपाने ११ कोटींचे उत्पन्न

मुंबई  : लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने नुकताच भारताचा दौरा केला होता. कोलकाता येथे झालेल्या १३ डिसेंबर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघाची सहाव्या स्थानावर घसरण

नवी दिल्ली  : माऊंट मांघनाई इथे सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजचा ३२३ धावांनी धुव्वा उडवत न्यूझीलंडने

युवा भारताचे स्वप्न अधुरे!

१३ वर्षांनंतर पाकची जेतेपदावर मोहोर दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी झाला. या

भारतीय महिला संघाची विजयी सलामी

जेमिमाच्या अर्धशतकाने श्रीलंकेची कोंडी; मालिकेत १-० ने आघाडी विशाखापट्टणम : महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चे