दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांवर वाढीव भार


अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ केल्याने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कवाढीचा परत एकदा फटका बसणार आहे. शिक्षण मंडळाकडून ही सलग चौथ्यावर्षी शुल्कवाढ केली आहे. त्यामुळे शुल्कवाढीमुळे पालकवर्गात नाराजीचा सूर आहे.


मागीलवर्षी शिक्षण मंडळाने शुल्कवाढ केली होती. ही परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली आहे. मार्च २०२५ मध्येच १२ टक्क्यांनी शुल्कवाढ केली होती. आता पुन्हा मार्च २०२६ साठी वाढ लागू केली आहे. एवढेच नव्हेतर प्रमाणपत्रे, गुणपत्रक लॅमिनेशन व इतर बाबींसाठी स्वतंत्र शुल्क आकारले जाणार असल्याने पालकांच्या खिशावर आर्थिक ताण येणार आहे. शिक्षण मंडळाने प्रशासकीय खर्च, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया व परीक्षा संचालनाशी संबंधित खर्च वाढल्याचे कारण दिलेले असले, तरी प्रत्यक्ष हा भार पालकांनाच पेलावा लागणार आहे. दहावी परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांसाठी आधी ४७० रुपये असलेले शुल्क आता थेट ५२० रुपयांवर नेण्यात आले आहे, तर इयत्ता बारावी परीक्षेचे शुल्क ४९० वरून ५४० रुपये करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त