‘मोंथा’चक्रीवादळामुळे ओडिशा, आंध्र प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’

नवी दिल्ली  : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर झाले असून या चक्रीवादळाला थायलंडने सुचवलेले ‘मोंथा’ हे नाव देण्यात आले आहे. पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर असणारे हे चक्रीवादळ मोंथा वेगाने उत्तर-पश्चिमेकडे सरकत आहे. मंगळवारी पहाटे ५.३० वाजता या चक्रीवादळाचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान ‘मोंथा’ चक्रीवादळामुळे ओडिशा, आंध्र प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ‘रेड अलर्ट’ देण्यात आला.


तसेच ही हवामान प्रणाली पहाटे ५.३० वाजता मछलीपट्टणमच्या १९० किमी दक्षिण ते आग्नेयेला, काकीनाडाच्या २७० किमी दक्षिण ते आग्नेयेला आणि विझागच्या ३४० किमी दक्षिण-आग्नेयेला केंद्रित होती, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सोमवारी मोंथा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ज्या भागात पाऊस आणि पुराची शक्यता आहे अशा भागांत अधिकाऱ्यांना खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, ओडिशाच्या आठ जिल्ह्यांमध्येही मोंथा चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस कोसळत आहेत. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर, ओडिशा सरकारने मालकानगिरी, कोरापूट, रायगड, गजपती, गंजम, नबरंगपूर, कालाहांडी आणि कंधमाल या आठ जिल्ह्यांमधील सखल भागातून तसेच भूस्खलनाची शक्यता असलेल्या डोंगराळ प्रदेशातून लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

Comments
Add Comment

खराब जेवण देणं पडलं महागात, भारतीय रेल्वेने आकारला ६० लाख रुपयांचा दंड

मुंबई: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचे अन्न

रशियाकडून ६ कोटी बॅरल तेल खरेदी, एप्रिल महिन्यात होणार पुरवठा

नवी दिल्ली : आखाती देशातील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून तब्बल ६ कोटी बॅरल तेलाची खरेदी केली

देशामध्ये १०० नवीन विमानतळ, २०० हेलीपॅड उभारणार, केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत देशाच्या विमान वाहतूक, इमिग्रेशन आणि

देशभरात पेट्रोल-डिझेल, एलपीजीचा पुरवठा सुरळीत, सर्वपक्षीय बैठकीत सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली  : पश्चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठकीचे

पीएनजी असलेल्या भागात एलपीजी पुरवठा होणार बंद

नवी दिल्ली : देशातील ऊर्जा साखळीत मोठी सुधारणा करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले

आकाशवाणीवरुन २६ मार्चपासून "वंदे मातरम्" राष्ट्रीय गीताची पूर्ण आवृत्तीचे प्रसारण

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर आकाशवाणी केंद्रांच्या सकाळच्या प्रसारणाची सुरुवात वैशिष्ट्यपूर्ण 'सिग्नेचर