भारताला मोठा धक्का: दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी तीन T20 सामन्यांमधून बाहेर!

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या अपडेटनुसार, तरुण अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीच्या मानेतील दुखापतीमुळे त्याच्या पुनरागमनाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. या दुखापतीमुळे त्याच्या फिटनेस आणि हालचालींवर परिणाम झाल्याचे अधिकृत निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

२२ वर्षीय रेड्डीला २३ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डाव्या क्वॅड्रिसेप्सची दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो सिडनीत झालेल्या त्या सामन्यात खेळू शकला नाही. त्या लढतीत भारताने दमदार कामगिरी करत नऊ विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेतील फरक २-१ असा कमी केला.

सध्या भारतीय संघाला त्यांच्या प्रमुख अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीचा फटका बसला आहे. हार्दिक अजूनही क्वाड्रिसेप्स दुखापतीतून सावरण्याच्या प्रक्रियेत आहे. मात्र, संघासाठी सकारात्मक बाब म्हणजे दुसरा सीम-बॉलिंग ऑलराउंडर शिवम दुबे आता पूर्णपणे तंदुरुस्त असून, रणजी ट्रॉफीतील पहिल्या फेरीत पाठीच्या दुखण्यामुळे बाहेर राहिल्यानंतर तो कॅनबेरामध्ये झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी संघात पुनरागमन करत आहे.

रेड्डीचे दुखापतींशी नाते काही नवीन नाही. या वर्षीच त्याला अनेकदा फिटनेस समस्यांना सामोरे जावे लागले आहे. जुलै महिन्यातील इंग्लंड दौऱ्यात, गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला चौथ्या आणि पाचव्या कसोटीतून बाहेर पडावे लागले होते. त्यानंतर जिममध्ये सराव करताना मानेच्या स्नायूंना इजा झाल्याने त्याची समस्या आणखी वाढली.

नोव्हेंबर २०२४ मध्ये पर्थ कसोटीत पदार्पण केल्यापासून रेड्डीने भारतासाठी आतापर्यंत १५ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि त्याच्या ऑलराउंडर क्षमतेने प्रभाव पाडला आहे.

दरम्यान, कॅनबेरा येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल या तीन फिरकी गोलंदाजांवर भर दिला. सप्टेंबरमध्ये झालेल्या आशिया कपमधील यशस्वी फिरकी जोडीचीच रणनीती संघ व्यवस्थापनाने पुढे चालू ठेवली आहे.

बीसीसीआयने सांगितले आहे की नितीश रेड्डीच्या तब्येतीवर तज्ज्ञ वैद्यकीय पथक बारकाईने लक्ष ठेवत असून, त्याच्या फिटनेसबाबत अंतिम निर्णय पुढील काही दिवसांत घेतला जाईल.
Comments
Add Comment

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे

वन डे रँकिंगमध्ये स्मृती मानधनाचे वर्चस्व कायम

मुंबई : आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने चमकदार कामगिरी केली

‘क्लच चेस’मध्ये गुकेशचा हिकारू नाकामुरावर पलटवार

मुंबई  : ‘चॅम्पियन्स शोडाउन’ या प्रतिष्ठित रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय विश्वविजेता डी.

IND vs AUS : सेमीफायनलवर पावसाचं सावट, सामना रद्द झाल्यास काय होणार?

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक आता अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचला आहे. उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया