तानसा धरणावर १०० मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प; महापालिकेचे वाचणार वर्षाला १६५ कोटी रुपये

मुंबई (खास प्रतिनिधी) : ​मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या तानसा धरणावर आता वीज निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. या धरणातील पाण्यावर १०० मेगावॉट क्षमतेचा भव्य सौर ऊर्जा प्रकल्प असून महापालिकेला एकाही पैसा खर्च करावा लागणार नाही. महाप्रीतच्या वतीने हा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने निर्मित होणाऱ्या प्रकल्पातील विजेचा वापर करण्यात येणार असल्याने महापालिकेचा विजेवर होणाऱ्या खर्चा पैकी १५७ कोटी रुपयांची बचत होणार आहे.


तानसा धरणातील पाण्यावर उभारण्यात येणारा हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी न घेण्यात आला आहे. महात्मा फुले रिन्यूएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड ( - महाप्रित) च्या वतीने हा प्रकल्प साकारला जाणार आहे. तानसा धरणातील या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी पाण्यावर पॅनेल उभारून त्याद्वारे वीज निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प २५ वर्षांकरता या संस्थेमार्फत केला जाणार आहे. या प्रकल्पातून उपलब्ध होणारी वीज ही महापालिकेला ४.२५ रुपये प्रति युनिट दराने मिळणार आहे. महापालिकेच्या अंदाजानुसार, यामुळे भविष्यात एका वर्षात तब्बल १६५ कोटी रुपयांची मोठी बचत होणार आहे. सध्याच्या वीज दराच्या तुलनेत हा दर अत्यंत कमी असल्याने महापालिकेला हा मोठा दिलासा मिळणार आहे.


हा प्रकल्प केवळ मुंबई महापालिकेच्या पैशांची बचत करणार नाही, तर शहराला स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा पुरवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार आहे. मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी वीज महत्त्वाची असते आणि आता ही वीज थेट धरणावरच निर्माण होणार असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे यासाठी महापालिकेचा एकही पैसा खर्च होणार नाही.


​प्रकल्पाची वैशिष्ट्ये:


​क्षमता: १०० मेगावॉट वीज निर्मिती
​संस्थेचे नाव: महाप्रित
​वीज खरेदी दर: ४.२५ रुपये प्रति युनिट
​अपेक्षित बचत: १६५ कोटी रुपये

Comments
Add Comment

BMC : आयुक्तांची प्रत्यक्ष भेट,सभागृहात नगरसेवकांची गरमागरमी, त्यानंतरही दादर रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी दादरसह माटुंगा परिसरातील फेरीवाल्यांवरील

BMC : मुंबईत सव्वा लाख मुलींना देणार एचपीव्ही लस

- राष्ट्रीय मोहिमेचा शनिवारी झाला शुभारंभ - पहिल्या टप्प्यात महापालिका शाळांमधील सुमारे २५ हजार मुलींचा

Food delivery staff : ऑनलाईन फूड डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी सक्तीची

मुंबई : राज्यात ऑनलाईन खाद्यपदार्थ वितरण करणाऱ्या कंपन्यांना यापुढे कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी बंधनकारक

आता मुंबईत धावणार पत्रकार-कॅमेरामनसाठी स्वतंत्र अॅम्ब्युलन्स

- मुख्यमंत्री फडणवीस, शिंदेंनी केले सेवेचे लोकार्पण.... - 'आरबीजी फाउंडेशन-टीव्हीजेए'चा उपक्रम; लालबागचा राजा

Niranjan Davkhare : मुंबई-ठाणेकरांचा मेट्रो प्रवास लवकरच सुसाट! 'मेट्रो-४' प्रकल्पाच्या टप्प्याटप्प्याने उद्घाटनाचे सरकारचे नियोजन

मुंबई : मुंबई आणि ठाणे या जोडशहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करणाऱ्या 'मेट्रो-४' (ग्रीन लाईन) प्रकल्पाचे काम

Mumbai Traffic AI Management System : आता मुंबईच्या ट्राफ‍िक मॅनेजमेंटसाठी होणार AI ची मदत

- मुंबई उपनर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांची माहिती मुंबई : एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईच्या ट्राफ‍िक