तानसा धरणावर १०० मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प; महापालिकेचे वाचणार वर्षाला १६५ कोटी रुपये

मुंबई (खास प्रतिनिधी) : ​मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या तानसा धरणावर आता वीज निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. या धरणातील पाण्यावर १०० मेगावॉट क्षमतेचा भव्य सौर ऊर्जा प्रकल्प असून महापालिकेला एकाही पैसा खर्च करावा लागणार नाही. महाप्रीतच्या वतीने हा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने निर्मित होणाऱ्या प्रकल्पातील विजेचा वापर करण्यात येणार असल्याने महापालिकेचा विजेवर होणाऱ्या खर्चा पैकी १५७ कोटी रुपयांची बचत होणार आहे.


तानसा धरणातील पाण्यावर उभारण्यात येणारा हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी न घेण्यात आला आहे. महात्मा फुले रिन्यूएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड ( - महाप्रित) च्या वतीने हा प्रकल्प साकारला जाणार आहे. तानसा धरणातील या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी पाण्यावर पॅनेल उभारून त्याद्वारे वीज निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प २५ वर्षांकरता या संस्थेमार्फत केला जाणार आहे. या प्रकल्पातून उपलब्ध होणारी वीज ही महापालिकेला ४.२५ रुपये प्रति युनिट दराने मिळणार आहे. महापालिकेच्या अंदाजानुसार, यामुळे भविष्यात एका वर्षात तब्बल १६५ कोटी रुपयांची मोठी बचत होणार आहे. सध्याच्या वीज दराच्या तुलनेत हा दर अत्यंत कमी असल्याने महापालिकेला हा मोठा दिलासा मिळणार आहे.


हा प्रकल्प केवळ मुंबई महापालिकेच्या पैशांची बचत करणार नाही, तर शहराला स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा पुरवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार आहे. मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी वीज महत्त्वाची असते आणि आता ही वीज थेट धरणावरच निर्माण होणार असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे यासाठी महापालिकेचा एकही पैसा खर्च होणार नाही.


​प्रकल्पाची वैशिष्ट्ये:


​क्षमता: १०० मेगावॉट वीज निर्मिती
​संस्थेचे नाव: महाप्रित
​वीज खरेदी दर: ४.२५ रुपये प्रति युनिट
​अपेक्षित बचत: १६५ कोटी रुपये

Comments
Add Comment

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.

अंधेरी रेल्वे स्टेशनवरील धर्मांतराचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल ; पोलीस तपासात आली भलतीच माहिती समोर

मुंबई : सोशल मीडियावर अंधेरी रेल्वे स्टेशनवर धर्मांतर सुरु असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात