तानसा धरणावर १०० मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्प; महापालिकेचे वाचणार वर्षाला १६५ कोटी रुपये

मुंबई (खास प्रतिनिधी) : ​मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या तानसा धरणावर आता वीज निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. या धरणातील पाण्यावर १०० मेगावॉट क्षमतेचा भव्य सौर ऊर्जा प्रकल्प असून महापालिकेला एकाही पैसा खर्च करावा लागणार नाही. महाप्रीतच्या वतीने हा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याने निर्मित होणाऱ्या प्रकल्पातील विजेचा वापर करण्यात येणार असल्याने महापालिकेचा विजेवर होणाऱ्या खर्चा पैकी १५७ कोटी रुपयांची बचत होणार आहे.


तानसा धरणातील पाण्यावर उभारण्यात येणारा हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी न घेण्यात आला आहे. महात्मा फुले रिन्यूएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड ( - महाप्रित) च्या वतीने हा प्रकल्प साकारला जाणार आहे. तानसा धरणातील या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी पाण्यावर पॅनेल उभारून त्याद्वारे वीज निर्मिती केली जाणार आहे. हा प्रकल्प २५ वर्षांकरता या संस्थेमार्फत केला जाणार आहे. या प्रकल्पातून उपलब्ध होणारी वीज ही महापालिकेला ४.२५ रुपये प्रति युनिट दराने मिळणार आहे. महापालिकेच्या अंदाजानुसार, यामुळे भविष्यात एका वर्षात तब्बल १६५ कोटी रुपयांची मोठी बचत होणार आहे. सध्याच्या वीज दराच्या तुलनेत हा दर अत्यंत कमी असल्याने महापालिकेला हा मोठा दिलासा मिळणार आहे.


हा प्रकल्प केवळ मुंबई महापालिकेच्या पैशांची बचत करणार नाही, तर शहराला स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा पुरवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरणार आहे. मुंबईच्या पाणीपुरवठ्यासाठी वीज महत्त्वाची असते आणि आता ही वीज थेट धरणावरच निर्माण होणार असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे यासाठी महापालिकेचा एकही पैसा खर्च होणार नाही.


​प्रकल्पाची वैशिष्ट्ये:


​क्षमता: १०० मेगावॉट वीज निर्मिती
​संस्थेचे नाव: महाप्रित
​वीज खरेदी दर: ४.२५ रुपये प्रति युनिट
​अपेक्षित बचत: १६५ कोटी रुपये

Comments
Add Comment

Mumbai Traffic AI Management System : आता मुंबईच्या ट्राफ‍िक मॅनेजमेंटसाठी होणार AI ची मदत

- मुंबई उपनर पालकमंत्री ॲड आशिष शेलार यांची माहिती मुंबई : एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन मुंबईच्या ट्राफ‍िक

Chembur Accident : चेंबूरमध्ये भीषण अपघात; बांधकामाच्या ८व्या मजल्यावरून ६ कामगार खाली पडले

मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष नगर भागात सुरू असलेल्या एका निर्माणाधीन

Vijay Rashmika : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रश्मिका-विजयने दिली 'गुड न्यूज'; चाहत्यांना सुखद धक्का!

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि 'नॅशनल क्रश' रश्मिका मंदाना अखेर विवाहबंधनात अडकले

मार्चच्या 'या' तारखेपासून बेस्ट बससेवेत बदल; काही मार्गांमध्ये फेरबदल तर काही ठिकाणी एसी सेवा

मुंबई : मुंबईकरांची सेवा करणारी बेस्ट बसच्या मार्गात आणि तिच्या फेऱ्यांमध्ये मुंबईकरांच्या सोयीनुसार परिवहन

1 March Rules Change : १ मार्चपासून बदलणार तुमच्या आयुष्याशी संबंधित 'हे' नियम; रेल्वे तिकीट बुकिंग पासून ते LPG सुद्धा...

येत्या १ मार्चपासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत.

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन