तीव्र प्रकाशात झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका तब्बल ५६ टक्क्यांनी अधिक

नवी दिल्ली : रात्री झोपताना खोलीत असणारा तेजस्वी प्रकाश केवळ झोपेवरच नव्हे, तर हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम करू शकतो, असा इशारा एका नव्या वैज्ञानिक अभ्यासातून देण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, रात्रीच्या वेळी उजेडात झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका तब्बल ५६ टक्क्यांनी अधिक असतो.


संशोधकांनी हजारो लोकांच्या झोपेच्या सवयी आणि आरोग्याचा अभ्यास केला. त्यात असे आढळले की, जे लोक रात्री झोपताना खोलीत दिवा, टीव्ही किंवा इतर कोणत्याही प्रकारचा तेजस्वी प्रकाश चालू ठेवतात, त्यांना हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. रात्रीचा प्रकाश शरीरातील नैसर्गिक जैविक घड्याळ बिघडवतो. यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते, रक्तदाब वाढतो आणि शरीरातील इतर महत्त्वाच्या क्रियांवरही परिणाम होतो. त्यामुळेच हृदयविकार आणि इतर गंभीर आजार टाळण्यासाठी रात्री झोपताना पूर्ण अंधारात झोपण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.


यावर उपाय म्हणून झोपताना दिवे बंद ठेवावेत, झोपेच्या खोलीत पडदे लावावेत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर कमी करावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शहरी भागात रात्रीच्या वेळी रस्त्यांवरील दिवे, घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर झगमगाटामुळे नागरिक सतत प्रकाशाच्या संपर्कात असतात. त्यामुळे या भागातील लोकांना हृदयविकाराचा धोका अधिक असल्याचे अभ्यासकांचे निरीक्षण आहे. नागरिकांनी आपल्या झोपेच्या सवयींमध्ये बदल करून आरोग्याची काळजी घ्यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवाद्यांच्या कारवायांना लागली घरघर, एकाचवेळी ३७ नक्षलवादी आले शरण

नवी दिल्ली : शरण या आणि नक्षलवाद्यांच्या भावी योजनांची तसेच तयारीची माहिती देऊन सरकारी योजनांचा लाभ घ्या अथवा

‘तिरुपती’च्या २० कोटी लाडूंसाठी वापरले ‘भेसळयुक्त’ तूप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): तिरुपती मंदिरात भेसळयुक्त तूप वापरून अंदाजे २० कोटी लाडू तयार करण्यात आले होते.

दिल्ली क्राईम ब्रँचची धडक कारवाई, आयएसआयशी संबंधित ४ आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करांना अटक

नवी दिल्ली: दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करीच्या टोळीतील चार

कोट्यावधींच्या सायबर फसवणुकीचा दिल्ली पोलिसांकडून पर्दाफाश; गुन्हेगारीचे मुळ उद्ध्वस्त करणाच्या हेतूने कारवाई

मुंबई : दिल्ली पोलिसांनी गेल्या ४८ तासांत मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीविरोधात मोहीम राबवत शेकडो फसवणूक

भारतात नवीन कामगार कायदे लागू, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल! काय होणार लाभ, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी देशात चार नवीन कामगार कायदे लागू करत असल्याची मोठी घोषणा

नितीश कुमार यांनी २० वर्षांनी गृहमंत्री पद सोडले

१८ मंत्र्यांची खाती जाहीर पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी दुसऱ्या दिवशी