तीव्र प्रकाशात झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका तब्बल ५६ टक्क्यांनी अधिक

नवी दिल्ली : रात्री झोपताना खोलीत असणारा तेजस्वी प्रकाश केवळ झोपेवरच नव्हे, तर हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम करू शकतो, असा इशारा एका नव्या वैज्ञानिक अभ्यासातून देण्यात आला आहे. या अभ्यासानुसार, रात्रीच्या वेळी उजेडात झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका तब्बल ५६ टक्क्यांनी अधिक असतो.


संशोधकांनी हजारो लोकांच्या झोपेच्या सवयी आणि आरोग्याचा अभ्यास केला. त्यात असे आढळले की, जे लोक रात्री झोपताना खोलीत दिवा, टीव्ही किंवा इतर कोणत्याही प्रकारचा तेजस्वी प्रकाश चालू ठेवतात, त्यांना हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. रात्रीचा प्रकाश शरीरातील नैसर्गिक जैविक घड्याळ बिघडवतो. यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते, रक्तदाब वाढतो आणि शरीरातील इतर महत्त्वाच्या क्रियांवरही परिणाम होतो. त्यामुळेच हृदयविकार आणि इतर गंभीर आजार टाळण्यासाठी रात्री झोपताना पूर्ण अंधारात झोपण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.


यावर उपाय म्हणून झोपताना दिवे बंद ठेवावेत, झोपेच्या खोलीत पडदे लावावेत आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर कमी करावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शहरी भागात रात्रीच्या वेळी रस्त्यांवरील दिवे, घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर झगमगाटामुळे नागरिक सतत प्रकाशाच्या संपर्कात असतात. त्यामुळे या भागातील लोकांना हृदयविकाराचा धोका अधिक असल्याचे अभ्यासकांचे निरीक्षण आहे. नागरिकांनी आपल्या झोपेच्या सवयींमध्ये बदल करून आरोग्याची काळजी घ्यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

January : भारतीय मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची गरुडझेप; जानेवारीत 'PMI' मध्ये सुधारणा, पण उद्योजकांच्या मनात धाकधूक!

भारतीय अर्थव्यवस्था आणि उत्पादन क्षेत्रासाठी जानेवारी २०२६ हा महिना संमिश्र पण काहीसा दिलासादायक ठरला आहे.

Gold-Silver Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं- चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या नवे दर

मुंबई: रविवार १ फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प जाहीर झाला. यावेळी सोने आणि चांदीबाबत कोणतीही मोठी थेट घोषणा

‘आशियामध्ये शांततेसाठी अरब राष्ट्राची भूमिका कौतुकास्पद’

नवी दिल्ली : अरब देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी

भारताचे आतापर्यंतचे सर्वात मोठे संरक्षण बजेट

नवी दिल्ली : यंदाच्या बजेटमध्ये संरक्षण विभागासाठी ७.८ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संरक्षणासाठी

भूतान, नेपाळ, श्रीलंका याविश्वासू मित्रांसाठी मदतीचा हात, संबंधातील कडवटपणामुळे बांगलादेशला आर्थिक झटका

नवी दिल्ली  : केंद्रातील मोदी सरकारने २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना आपल्या परराष्ट्र धोरणाचे

इतर देशांच्या तुलनेत किती मोठे आहे देशाचे संरक्षण बजेट

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर केले. यंदाच्या बजेटमध्ये भारताच्या