‘मोंथा’ चक्रीवादळाचा इशारा; ५ राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता

दिल्ली: आंध्रप्रदेशच्या समुद्रकिनाऱ्यावरुन मोंथा चक्रीवादळ पुढे सरकत आहे. पुढील २४ तासांच्या आत २८ ऑक्टोबरच्या रात्री आंध्रप्रदेशच्या समुद्र किनाऱ्यावर मछलीपट्टनम आणि कलिंगपट्टनम दरम्यान काकीनाडाजवळ धडकण्याचा अंदाज आहे. सोमवारी रात्री जारी केलेल्या हवामान विभागाच्या रिपोर्टनुसार, दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ मोंथा गेल्या सहा सहा तासात साधारण १३ किलोमीटर प्रतितासाच्या गतीने उत्तर-पश्चिम दिशेने पुढे जात आहे. २८ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता आहे.


'मोंथा'मुळे विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता


'मोंथा' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील विदर्भात २८ ते ३० ऑक्टोबर दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी याबाबत घोषणा केली आहे. गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि नागपूरमधील काही भागात मुसळधार पाऊस, ढगांचा गडगडाट आणि ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हवामान विभागाकडून या भागात 'यल्लो' अलर्ट जारी करण्यात आला आहे.


वैज्ञानिक प्रवीण कुमार (प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर) यांनी सांगितले की, 'मोंथा' चक्रीवादळ पश्चिम-मध्य आणि आग्नेय बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य आणि लगतच्या भागातून उत्तर-वायव्येकडे सरकले आहे, ज्यामुळे या प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे.


५ राज्यांमध्ये 22 एनडीआरएफची पथके तैनात


मोंथा चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू आहे. वाढता धोका पाहता सरकारने पाचही बाधित राज्यांमध्ये 22 एनडीआरएफची पथके तैनात केली आहेत. एनडीआरएफचे डीआयजी मोहसीन शाहिदी यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, आतापर्यंत आंध्र प्रदेश, ओडिशा, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि छत्तीसगडमधील सर्व बाधित भागात एनडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत.

Comments
Add Comment

Noida Employees Protest : पगारवाढीवरून सुरु झालेल्या आंदोलनाने घेतले हिंसक वळण; पोलिसांची वाहने उलथवून टाकली तर कंपनीवर तुफान दगडफेक सुरु

- एकाच वेळी ६ कंपन्यांतील कामगारांचे आंदोलन सुरु उत्तर प्रदेश मधील नोएडा येथे वेतनवाढीच्या मागणीसाठी कारखाना

Nari Shakti Vandan Sammelan : पंतप्रधान नरेंद्र मोदी नारी शक्ती वंदन संमेलनाच्या माध्यमातून कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नारी शक्ती वंदन संमेलनाच्या

Earned Leave : कर्मचाऱ्यांना सुट्यांच्या बदल्यात मिळणार पैसे

नवी दिल्ली : देशातील लाखो नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या नव्या लेबर कोडमुळे आता न वापरलेल्या

Asha Bhosle : स्वरस्वामिनी आशा भोसले यांना पंतप्रधान मोदींनी वाहिली खास मराठीतून आदरांजली

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या

Manipur Violence : उग्रवाद्यांच्या भीषण हल्ल्यात BSF जवान शहीद, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद

मणिपूरच्या (Manipur Violence) उखरुल जिल्ह्यात शुक्रवारी (१० एप्रिल) उग्रवाद्यांच्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ)

Supreme Court : 'मतदान करणे आणि निवडणूक लढवणे हे मूलभूत अधिकार नाहीत'

नवी दिल्ली : मतदानाचा अधिकार किंवा निवडणूक लढवण्याचा अधिकार यांपैकी कोणताही अधिकार हा 'मूलभूत अधिकार' नाही, असे