जनगणना २०२७: मुंबईत पूर्व चाचणी चेंबूर एम पश्चिम विभागात

मुंबई (खास प्रतिनिधी) : जनगणना - २०२७ च्या तयारीचा एक भाग म्हणून, पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. ज्यामध्ये जनगणनेच्या सर्व पैलूंचा समावेश असेल. जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्याची म्हणजे घरयादी व घर गणनेची पूर्वचाचणी १० नोव्हेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केली जाईल. तसेच स्व-गणना करण्याचा पर्यायही १ नोव्हेंबर २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत उपलब्ध असेल. महानगरपालिका क्षेत्रात एम पश्चिम प्रभागामध्ये अर्थात चेंबूर भागात जनगणना पूर्वचाचणी करण्यात येणार आहे.


जनगणना पूर्वचाचणीच्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची जनगणना संचालनालयाच्या संचालक, डॉ. निरूपमा जे. डांगे यांनी मंगळवारी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी भेट घेतली. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यावेळी उपस्थित होते.


महाराष्ट्र राज्यातील घरयादी व घरगणनेची पूर्वचाचणी निवडक तीन नमुना क्षेत्रांमध्ये केली जाणार आहे. पूर्वचाचणीकरिता निवडलेल्या नमुना क्षेत्रांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या एम/पश्चिम प्रभागातील १३५ घर यादी गट, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तहसील येथील २६ गावे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तहसील येथील ४५ गावे यांचा समावेश आहे. या क्षेत्रांमध्ये होणाऱ्या जनगणना पूर्वचाचणीसाठी जनगणना अधिनियम, १९४८ च्या तरतुदी लागू राहतील. पूर्वचाचणीच्या अनुषंगाने राज्यात ४०२ प्रगणक आणि पर्यवेक्षकांचा चमू कार्यरत असणार आहे.


केंद्र शासनाने सन २०२७ मध्ये जनगणना घेण्याचा निर्णय आधीच अधिसूचित केला आहे. जनगणनेचा पहिला टप्पा म्हणजे घरयादी व घरगणना (टप्पा-१) हा एप्रिल ते सप्टेंबर, २०२६ या दरम्यान एका महिन्याच्या कालावधीत पार पडेल. लोकसंख्या गणना (टप्पा-२) फेब्रुवारी २०२७ मध्ये पार पडेल. जनगणना ही जनगणना अधिनियम, १९४८ च्या तरतुदीनुसार केली जाते. जनगणनेकरिता नियुक्त केलेल्या प्रगणक व पर्यवेक्षक, जे माहिती संकलनासाठी वाटप केलेल्या क्षेत्रातील घरे व कुटुंबाना भेट देतील, त्यांना योग्य ते सहकार्य करावे,असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील ७ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई: महाराष्ट्र शासनाने नुकतेच प्रशासकीय कामकाजात मोठे फेरबदल केले असून, सात वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)

नोव्हेंबर महिन्यात कोणत्या दिवशी बँका राहणार बंद? जाणून घ्या...

मुंबई : नोव्हेंबर महिन्यात बँकांशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास आधीच सावधान राहा, कारण नोव्हेंबरमध्ये

कबुतर खान्यांसाठी जैन समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली मुंबई महापालिका आयुक्तांची भेट, केली ही मागणी...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा

इयत्ता पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारी रोजी

मुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता

उद्धव ठाकरे हे स्वतःच 'अजगर'- बावनकुळेंचा जोरदार हल्ला, 'आयत्या बिळावर नागोबा' म्हणत शेलारांची टीका

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण अ‍ॅनाकोंडा, अजगर या शब्दांच्या टीकेवरून चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरेंनी

मुंबईच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना मोठा दिलासा, रेल्वेकडून पर्यायी पादचारी पूल झाला खुला

मुंबई : शीव रेल्वे उड्डाणपुलाचे काम आता लवकरच सुरु होणार असून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने एक