मुंबईच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना मोठा दिलासा, रेल्वेकडून पर्यायी पादचारी पूल झाला खुला

मुंबई : शीव रेल्वे उड्डाणपुलाचे काम आता लवकरच सुरु होणार असून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने एक पर्यायी पादचारी पूल नागरिकांसाठी खुला केला आहे. त्यामुळे स्थानिकांना पूर्व - पश्चिमकडे ये - जा करणे सोपं होईल. तर जुना उड्डाणपूल हा येत्या ३ महिन्यात पाडण्यात येणार आहे. व त्यानंतरच नवीन उड्डाणपुलाचे काम सुरु होणार आहे.



शीव रेल्वे उड्डाणपुलाच्या पाडकामातील अडथळा आता दूर झाला आहे. मध्य रेल्वेने पर्याय म्हणून एक पादचारी पूल उभारला असून तो लोकांसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे उड्डाणपुलाचे उर्वरित पाडकाम सुरु होणार असून येत्या तीन महिन्यात उड्डाणपूल जमीनदोस्त केला जाईल.



पूर्वी शीव उड्डाणपूल बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. वाहनचालक आणि पादचाऱ्यांना लांबचा वळसा घ्यावा लागत होता. पुलाच्या परिसरात शाळा, महाविद्यालय आणि रुग्ण्यालाय असल्याने, पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईपर्यंत नागरिकांनी संपूर्ण पूल पाडण्यास तीव्र विरोध दर्शवला होता .


स्थानिक आणि इतर पादचाऱ्यांसाठी ५६ मीटर लांब आणि ३ मीटर रुंद असा पादचारी पूल उभारण्यात आला आहे. हा पूल आता पूर्ण झाला असून, स्थानिकांच्या वापरासाठी खुला करण्यात आला आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितलं की , "शीव रेल्वे उड्डाणपुलाच्या धारावी दिशेकडील पादचारी पुलामुळे प्रवाशांना पूर्व - पश्चिमकडे ये जा करण्यासाठी पर्याय उपलब्ध झाला आहे.



उड्डाणपुलाच्या दोन मार्गिकेपैकी एक मार्गिका स्थानिकांना ये- या करण्यासाठी राखीव ठेवण्यात आली होती. आता पादचारी पूल खुला झाल्याने दुसऱ्या मार्गिकेचे तोडकाम सुरु करण्यात येत आहे. जानेवारी २०२६ अखेर पूलाचे बांधकाम सुरू करण्याचे नियोजन आहे.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य