आजपासून मुंबईत 'इंडिया मेरीटाईम सप्ताह', केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी) : शंभराहून अधिक देशातील एक लाखापेक्षा अधिक प्रतिनिधी, ५०० प्रदर्शक, २०० पेक्षा अधिक तज्ज्ञ वक्ते, दहा मोठे संलग्न कार्यक्रम, दहा लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीच्या संधी... उद्घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आणि समारोपादिवशी दोन सत्रात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग ! संपूर्ण जगाच्या सागरी व्यापार आणि विकासासंदर्भातील महत्त्वाचा कार्यक्रम मानला जाणारा 'इंडिया मेरीटाईम वुईक- २०२५' आजपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत गोरेगावमधील 'मुंबई एक्झिबिशन सेंटर'मध्ये होत आहे.


भारताच्या सागरी विकासात 'मैलाचा दगड' म्हणून नोंद होणाऱ्या या महासोहळ्याचे यजमानपद केंद्रीय बंदरे, नौकानयन आणि जलवाहतूक मंत्रालयाकडे असले, तरी त्याच्या स्थानिक संयोजन आणि एकूण समन्वयाची जबाबदारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डावर सोपवण्यात आली आहे. राज्याच्या बंदरे व मत्स्यव्यवसाय विकास विभागांतर्गत येणाऱ्या या मंडळाचे नेतृत्व सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे आहे.


देशाच्या बंदर आणि जलवाहतूक क्षेत्राचे मुंबई हे प्रवेशद्वार आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि ४०० वर्षांपेक्षा अधिक सागरी वारसा लाभलेले शहर म्हणून मुंबईची जगात ख्याती आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि तदनुषंगिक घडामोडींसाठी मुंबईचे नांव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच चर्चेत असते. सागरी विषयाशी संदर्भातील जगात मोठा आणि महत्त्वाचा असलेला हा सप्ताह त्यामुळेच मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीला याचा मोठा लाभ होईल, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.


मनुष्यजातीचा समुद्र पर्यटनाचा वारसा, जलवाहतुकीसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि 'निळ्या क्रांतीला शाश्वत दिशा देण्यासाठी तज्ञांचे विचारमंथन हे या सप्ताहाचे वैशिष्ट्य ठरेल, असे केंद्रीय बंदरे आणि जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी उ‌द्घाटनाला, तर पंतप्रधान मोदी यांनी समारोपाला उपस्थित राहण्याचे मान्य करून या कार्यक्रमाचे देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेले महत्त्व अधोरेखित केले आहे.

Comments
Add Comment

Weastern Railway : पश्चिम रेल्वेकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण

मुंबई : पश्चिम रेल्वेने आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेसाठी व्यापक तयारी पूर्ण केली

अपघातग्रस्त कामगारांच्याबाबत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या तातडीसाठी उपाययोजना करा; कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई : राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावावा

Forest Minister Ganesh Naik : मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी १ हजार गावांमध्ये 'एआय अर्लट' यंत्रणा

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; २६० कोटींच्या कृती आराखड्यास मंजुरी मुंबई : राज्यातील वाढता मानव व वन्यजीव

Revenue Minister Bawankule : चाऱ्यासाठी सरकारी जमिनीवर आता गवत लागवड!

 बचत गट आणि बेरोजगार संस्थांशी भाडेकरार ; महसूलमंत्री बावनकुळे यांची महत्त्वाकांक्षी योजना मुंबई : गाव,

State President Ravindra Chavan : विधानपरिषदेच्या १२ जागांसाठी भाजपकडून ४८ नावांची यादी तयार

दिल्लीत होणार शिक्कामोर्तब; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण केंद्रीय गृहमंत्री, राष्ट्रीय अध्यक्षांची भेट

८९ हजार कोटींच्या ५ प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२० हजार रोजगार निर्माण होणार; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी मुंबई :