अप्रावा एनर्जीच्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या सोल्युशन्सचा फायदा ईशान्य भारतातील २१००० हून अधिक कुटुंबांना होणार

नवी दिल्ली: ईशान्य भारतातील जीवनाला शाश्वतपणे सक्षम करण्याच्या दिशेने एक अर्थपूर्ण पाऊल उचलत, भारतातील आघाडी एकात्मिक ऊर्जा सोल्युशन्स प्रदाता कंपन्यापैकी एक अप्रावा एनर्जीने (Apraavac Energy) आसाम आणि नागालँडमधील समुदाय, आरोग्य आणि शिक्षण सुविधांना सौर प्रतिष्ठापनांद्वारे ऊर्जा देण्यासाठी सेल्को फाउंडेशनसोबत भागीदारी केली आहे. कंपनीने म्हटल्याप्रमाणे याचे उद्दिष्ट गावांमध्ये शाश्वत आणि विश्वासार्ह ऊर्जा प्रदान करणे आहे ज्याचा २१००० हून अधिक कुटुंबांना सकारात्मक परिणाम होईल. कंपनीने आपल्या निवेदनात या प्रतिष्ठापनांमुळे दरवर्षी सुमारे ५७ टन CO₂ वाचेल अशी अपेक्षा आहे, जे दरवर्षी सुमारे २५८० झाडे लावण्याइतके आहे असे स्पष्ट केले आहे.


आसामच्या चिरांग जिल्ह्यात, २७.५ किलोवॅट क्षमतेची सौरऊर्जेवर चालणारी सामुदायिक सुविधा आरोग्य, उपजीविका, शिक्षण आणि युवा सहभागावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विविध विकास उपक्रमांना समर्थन देत आहे. या साइटमध्ये एक विणकाम युनिट समाविष्ट आहे जे स्थानिक महिला कारागिरांना कौशल्ये आणि शाश्वत उत्पन्न, मानसिक आरोग्य आणि फिजिओथेरपी क्लिनिक आणि घरगुती छळाला तोंड देणाऱ्या महिलांना मदत करणारे कायदेशीर मदत केंद्र प्रदान करते. एक उत्साही युवा केंद्र ८०० हून अधिक तरुणांसाठी प्रशिक्षण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची सुविधा देते, तसेच नियमित क्रीडा उपक्रम देखील आयोजित करते. शेतकरी, महिला उद्योजक आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थांसाठी क्षमता-निर्मिती सत्रे देखील आयोजित केली जातात. शिवाय १७ वन-आधारित शिक्षण केंद्रांमधील ७०० हून अधिक मुलांना आता स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वच्छता उपलब्ध आहे.


नागालँडमध्ये, कोहिमा जिल्ह्यातील झाकामा आणि झाडीमा ही गावे २२.३२ किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रतिष्ठापन आणि इन्व्हर्टर सिस्टीमचा फायदा घेत आहेत जी शाळा, आरोग्य केंद्रे आणि सामुदायिक क्षेत्रांना वीज पुरवत आहेत. या उपक्रमांमुळे १,००० हून अधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला पाठिंबा मिळाला आहे. ज्यामध्ये दुर्गम भागातील विद्यार्थी, पाच ग्रामीण शाळांना डिजिटल शिक्षण साधनांनी अपग्रेड केले आहे आणि सौरऊर्जेवर चालणाऱ्या रस्त्यावरील दिव्यांसह सामुदायिक सुरक्षितता सुधारली आहे.


या उपक्रमाबद्दल बोलताना, अप्रावा एनर्जीचे सीएसआर प्रमुख डॉ. प्रियेश मोदी म्हणाले,'शाश्वत समुदायांची निर्मिती आमच्या सीएसआर धोरणाच्या गाभ्यामध्ये आहे. ईशान्येकडील भागात, आम्ही समुदायांच्या तात्काळ आणि दीर्घकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी आमचे सहकार्य वाढवले आहे. हा उपक्रम समग्र विकासाचे एक मजबूत उदाहरण आहे, जो समाजातील प्रत्येक घटकाला शाश्वतपणे उन्नत करतो. आम्ही या प्रदेशात आमची व्यावसायिक उपस्थिती वाढवत असताना, अशा हस्तक्षेपांद्वारे अधिकाधिक जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.'


आसाममधील अप्रावाचा कृषी-शी कार्यक्रम (Apraava's Agri - SHE Programme) त्यांच्या सामुदायिक गुंतवणूक उपक्रमांचा एक भाग म्हणून, आसाममधील ३००० हून अधिक महिला उद्योजकांना शेती आणि पशुधन-आधारित उपजीविकेतील कौशल्ये प्रदान करत आहे. कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की,'अक्षय पात्र फाउंडेशनच्या सहकार्याने, कंपनीने आसाममधील जोरहाट येथे एक केंद्रीकृत मध्यान्ह भोजन स्वयंपाकघर देखील स्थापित केले आहे, जे दररोज सुमारे ११००० शालेय मुलांना पौष्टिक जेवण देते. अप्रावा राज्यातील वंचित समुदायांना उन्नत करण्यासाठी काम करणाऱ्या आसाममधील १५ तळागाळातील महिला परिवर्तनकर्त्यांना मदत करत आहे.'


अप्रावा सध्या आसाम, नागालँड आणि मणिपूरमध्ये ट्रान्समिशन मालमत्ता चालवते. त्यांनी आसाममध्ये स्मार्ट मीटर प्रकल्पासह प्रगत मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर (एएमआय) व्यवसायातही प्रवेश केला आहे, जो भारत सरकारच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत (आरडीएसएस) 'गो-लाइव्ह' दर्जा प्राप्त करणारा भारतातील पहिला प्रकल्प होता.

Comments
Add Comment

IPL 2027 : रिषभ पंत पुन्हा दिल्ली कॅपिटल्समध्ये ? कुलदीप यादव लखनऊ मध्ये !आयपीएल ट्रेडमध्ये कोणाला फायदा ?

Mumbai : आयपीएल २०२७ (IPL 2027) पूर्वी ट्रेडमुळे चर्चा रंगल्या आहेत. भारताचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) पुन्हा

Nashik : टवाळखोर, तळीराम खबरदार; सार्वजनिक ठिकाणी दिसाल तर....; अंबड पोलिसांचा धडाका; 74 जणांवर कारवाई

Nashik : सार्वजनिक ठिकाणी टवाळक्या करणे, उघड्यावर मद्यपान करून नागरिकांना त्रास देणे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा

Shrigonda Police Bribery Case : रक्षकच झाले भक्षक ! गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी घेतली ७ हजारांची लाच

Shrigonda Police Bribery Case : पोलिसांना रक्षक समजले जाते, पण हेच पोलीस भक्षक झाले तर सर्वसामान्यांनी जायचं कोणाकडे असा प्रश्न

Devendra Fadnavis : बी.टी. सरांच्या निधनाने वैयक्तिक मार्गदर्शकाला मुकलो!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना मुंबई, माजी आमदार, शिक्षणतज्ञ आणि विविध सामाजिक प्रश्नांचे गाढे

Nashik : 'आदिवासी विकास’मध्ये प्रथमच पेन्शन अदालत, आयुक्त लीना बनसोड यांनी जाणून घेतल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अडचणी

नाशिक : सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पेन्शन व इतर सेवाविषयक समस्यांचे जलद निराकरण

Etha Teaser : 'ईठा'मध्ये श्रद्धा कपूरची दमदार एन्ट्री; टीझर पाहून चाहत्यांच्या अंगावर काटा

श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) आगामी 'ईठा' (Etha) चित्रपट (Movie) सध्या चर्चेत आला आहे. या चित्रपटाचा पहिला टीझर (Teaser)