मुंबईहून सुटणाऱ्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसचा अपघात टळला

मुंबई : उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथे एक मोठा रेल्वे अपघात टळला. मुंबईहून भागलपूरला जाणारी लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेस दोन भागात विभागली गेली. एक जोडणी (कपलिंग) तुटल्याने मागील तीन डबे गाडीपासून वेगळे झाले. ट्रेनचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला. चार तासांनंतर तांत्रिक पथकाने डबे पुन्हा जोडून ट्रेन सोडण्याची परवानगी दिली.


मिळालेल्या माहितीनुसार रात्री २: ५४ वाजता माझगव्हाण आणि टिकिरीया रेल्वे स्थानकांदरम्यान हा अपघात झाला. सुदैवाने त्यावेळी ट्रेन ताशी १० किलोमीटर वेगाने धावत होती. या मंद गतीमुळे मोठा अपघात टळला. अपघातानंतर दाब कमी झाल्यामुळे ट्रेन आपोआप थांबली. ट्रेन ज्या ट्रॅकवर धावत होती तिथे आधीच एक सावधगिरीचा आदेश लागू होता. त्यामुळे लोको पायलटला वेग कमी करावा लागला. ही खबरदारी प्रवाशांसाठी फायद्याची ठरली.


रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एस -१ कोचचे कपलिंग तुटल्याने तीन डबे गाडीपासून वेगळे झाले. ट्रेनचा मंद वेग आणि तांत्रिक ब्रेकिंग सिस्टिम सक्रिय झाल्यामुळे अपघात नियंत्रणात राहिला. वेगळे झालेले डबे ट्रेनच्या सुमारे १०० मीटर मागे थांबले. त्यामुळे ट्रेनही थांबली, जर ट्रेन सामान्य वेगाने प्रवास करत असती तर भयानक जीवितहानी झाली असती.


अधिकाऱ्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. प्रवाशांच्या सुरक्षेची खबरदारी आधी घेण्यात आली. तंत्रज्ञांच्या तपासणीनंतर आणि सर्व डबे व्यवस्थित जोडून कपलिंग मजबूत असल्याची खात्री करुन घेतल्यानंतर सकाळी ट्रेन सोडण्यात आली. एरिया मॅनेजर नरेश सिंग, स्टेशन मास्तर अब्दुल मतीन, सीएनडब्लू, आरपीएफ,जीआरपीएफ आणि एक तांत्रिक टीम यांनी तपासणी करुन परवानगी दिली. यानंतर गाडी सकाळी सोडण्यात आली. सकाळी ७ वाजता ट्रेन भागलपूरला रवाना झाली. रेल्वे प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिला असून कपलिंग तुटण्याचे कारण शोधण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले आहे, प्राथमिक तपासणीत कपलिंग जॉईन्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे उघड झाले आहे. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आणि सुखरुप आहेत.

Comments
Add Comment

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Nagpur citizens : काठमांडूमधील नागपूरचे ११० नागरिक सुरक्षित; भारताकडे रवाना

नेपाळमधील काठमांडू येथे गेलेले नागपूर जिल्ह्यातील ११० नागरिक सुरक्षित नागरिकांच्या परतीच्या प्रवासासाठी

Eknath Shinde : राखीच्या धाग्यातून महिलांना मोठी ग्वाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ‘लाडक्या बहिणीं’ना आश्वासन

राखीच्या धाग्यातून महिलांच्या सर्वांगीण विकासाचा शब्द - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही माविम आणि उमेद

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबई-मडगांव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्

Mumbai Indians : मुंबईत उतरलं ‘मुंबई इंडियन्स’चं खास विमान; Malaysia Airlinesच्या A330ची पहिली लँडिंग, क्रिकेट चाहत्यांना सुखद धक्का

मुंबई : मुंबई इंडियन्सच्या निळ्या-गोल्डन रंगांनी सजलेलं Malaysia Airlinesचं खास Airbus A330-300 विमान बुधवारी, २६ ऑगस्ट रोजी मुंबईत

Devendra Fadnavis : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणी कोणालाही सोडणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)