मुंबईमध्ये उभारणार आलिशान 'मरिना'! समुद्र पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई बंदर प्राधिकरणाचे महत्त्वाचे पाऊल

मुंबई: मुंबईला लाभलेल्या अथांग समुद्राचा आणि समुद्रकिनाऱ्यांचा, समुद्राशी निगडित उपक्रमांसाठी वापर करण्याच्या दृष्टीने मुंबई बंदर प्राधिकरणाकडून नेहमी विविध प्रकल्पांचे नियोजन करण्यात येते. त्यातील मरिना प्रकल्पाचे नियोजन प्राधिकरणाने अलीकडेच केले आहे. त्यासंबंधीच्या हालचालींना वेग आला असून खासगी बोटी उभ्या करण्याचा हा तळ भाऊचा धक्का किनारपट्टीपासून ५२३ मीटर आत समुद्रात असणार आहे. हे मरिना १४ हेक्टर एवढ्या परिसरात उभारण्यात येत असून याच्या बांधकामाचा खर्च ४७० कोटी रुपये आहे.



स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर मुंबई बंदर प्राधिकरण कार्यरत आहे. प्राधिकरणाने आता मुंबईच्या किनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल सुरू केले असून, त्यासंबंधी अन्य उपक्रमही हाती घेतले आहेत. त्यातीलच मरिना हा महत्त्वाचा उपक्रम आहे. या मरिनाची उभारणी १०० टक्के खासगी विकासकाच्या माध्यमातून होणार आहे. त्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.




एकदा मरिनासाठीचे कंत्राटदार ठरल्यानंतर त्या ठिकाणी आलिशान हॉटेल, बँका, एटीएम केंद्र, मरिनावर आलेल्यांना मुंबईत नेण्यासाठीच्या कॅबचा तळ, बहुमजली वाहनतळ, बँक्वेट हॉल, क्लब हाउस, लॉन, व्यवसाय केंद्र, तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी सुपर मार्केट, कन्व्हेन्शन केंद्र, बोटींच्या देखभाल व दुरुस्तीची केंद्रे, सीमा शुल्क तपासणी कार्यालय अशा अन्य प्रकारच्या सोयी-सुविधाही उभारल्या जाणार आहेत.



मरिना अंतर्गत एकूण ४२४ यॉट किंवा बोटी उभ्या करण्याची सोय असेल. या बोटींची कमाल लांबी ३० मीटर किंवा त्याहून कमी असेल. मरिना ही संकल्पना प्रामुख्याने अमेरिका किंवा समुद्री क्षेत्रात पुढे असलेल्या नेदरलँड्स, डेन्मार्क या देशांमध्ये आहे.

Comments
Add Comment

२६ जानेवारीपासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सेवांचा विस्तार; दररोजसाठी वाढणार इतक्या फेऱ्या

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. २६ जानेवारी २०२६ पासून पश्चिम

राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल — उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ संपन्न विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या

मनपा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकल्यानंतर २४ तासांच्या आत मंत्रिमंडळाची बैठक, झाले महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला. या निकालानुसार

44-Hour Water Block : मुंबईतील धारावीसह पूर्व आणि पश्चिम उपनगर येत्या मंगळवारपासून ४४ तासांचा पाणी ब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या

Nitesh Rane : 'हा' तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा!"- महायुतीच्या विजयानंतर नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या.