तरुणांना नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी दिल्लीत 'युवा-एआय' स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी यूजीसीकडून सर्व विद्यापीठांना पत्र…


८५ लाखांची बक्षिसं!


मुंबई  : भारतातील तरुणांना एआय क्षेत्रात नवोन्मेषाचे निर्माते बनवण्यासाठी 'युवा-एआय - ग्लोबल युथ चॅलेंज' ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा जाहीर झाली आहे. १३ ते २१ वयोगटातील विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२५ आहे. विजेत्यांना ८५ लाख रुपयांची पारितोषिके मिळतील. निवडलेल्या संघांना दिल्लीतील 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६' मध्ये आपले प्रकल्प सादर करण्याची संधी मिळेल.


या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सर्व विद्यापीठांना पत्र पाठवून त्यात विद्यार्थांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले आहे. या स्पर्धेसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर असल्याचेही यूजीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे आयोजित होणाऱ्या ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’चे आयोजन करण्यात येत आहे. १९ ते २० फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या या परिषदेत ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. नवी दिल्लीतील ‘भारत मंडपम्’ येथे होणाऱ्या या परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. परिषदेत जगभरातील राष्ट्रप्रमुख, धोरणकर्ते, संशोधक आणि तज्ज्ञ मंडळी सहभागी होणार आहेत.


हवामान बदल, शिक्षणातील समावेशकता, स्वच्छ ऊर्जा, स्मार्ट सिटी, आरोग्य, कृषी आणि वृद्धांच्या सेवेसाठी एआय-आधारित उपाय सुचवणाऱ्या विद्यार्थ्यांना या मंचावर विशेष प्रोत्साहन मिळणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना आपले प्रकल्प जागतिक पातळीवर सादर करण्याची संधीही मिळणार आहे. या स्पर्धेसाठी निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्लीत होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोफत प्रवास आणि निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे.


‘युवा-एआय’ या स्पर्धेत एकूण ८५ लाखांची पारितोषिके देण्यात येणार असून, सर्वोत्तम तीन उपायांना प्रत्येकी १५ लाख रुपये, पुढील तीन उपायांना प्रत्येकी १० लाख रुपये, तर दोन विशेष पुरस्कार म्हणून ५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि विजेत्यांना विशेष सन्मानदेखील दिला जाणार आहे.
‘युवा-एआय’च्या माध्यमातून भारतात ‘एआय रेडी’ युवा पिढी घडविणे, नवकल्पक विचारांना चालना देणे आणि सामाजिक समस्यांवर तंत्रज्ञानाधारित उपाय शोधणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे, असे यूजीसी सचिव प्रा. मनीष जोशी यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

CRIME : नवांशहर हादरले! बेपत्ता राधिकाची निर्घृण हत्या; ब्रीफकेसमध्ये मृतदेह भरून जंगलात जाळला

NAWANSHAHR DISTRICT PUNJAB : गेल्या चार-पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १५ वर्षीय राधिका या दहावीच्या विद्यार्थिनीचा अखेर

Rules For Edible Oil:  खाद्यतेल विक्रीचे नियम बदलणार! केंद्राचा मोठा निर्णय, आता फक्त ९ पॅक साइजमध्येच मिळणार तेल

सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल रोखण्यासाठी आणि बाजारपेठेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकारने

हजारांच्या पगारापासून कोट्यवधींची संपत्ती? ओडिशातील अभियंत्याच्या ठिकाणी छापे, २ कोटींची रोकड जप्त

ओडिशामध्ये (odisha) भ्रष्टाचाराविरोधात (Corruption) मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) एका सरकारी

Major Diplomatic Twist India-Nepal Meeting : नेपाळचा भारताकडे स्पष्ट कल! दिल्लीतील उच्चस्तरीय बैठकीनंतर चीनची चिंता वाढली

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील ताज हॉटेलमध्ये शनिवारी भारत आणि नेपाळ यांच्यात महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक

Monkey's Pool Party Inside Taj Mahal : ताजमहालच्या फाउंटनमध्ये माकडांची 'पूल-पार्टी'! उकाड्यापासून वाचण्यासाठी वानरसेनेची धम्माल; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवत आहेत. या कडक उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी जशी

India Slam Pakistan at UN : 'खोट्या गोष्टी पसरवण्याची पाकिस्तानला सवय', संयुक्त राष्ट्रात काश्मीर प्रश्नावर भारताची स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) त्याची खरी जागा पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. जम्मू आणि