सतीश शाह यांच्या निधनापूर्वी नक्की काय घडलं ? मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई : हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे काल शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात निधन झाले, आज (रविवारी ) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सतीश यांना निरोप देण्यासाठी सिनेविश्वातील बरेच कलाकार उपस्तिथ होते. गेले काही महिने ते मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते. शाह यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आला होत, पण मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.


याबाबदल त्यांच्या मॅनेजर ने काही खुलासे केले आहेत. एक मुलाखतीत सतीश शाह यांचे मॅनेजर रमेश कडातला यांनी सांगितले की ' काळ दुपारी जेवताना हा सर्व प्रकार घडला 'दुपारी २ च्या सुमारास ते जेवायला बसले आणि अचानक बेशुद्ध पडले. अर्ध्या तासांनंतर रुग्णवाहिका आली त्यांना आम्ही लगेचच रुग्णालयात घेऊन गेलो. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सतिश शाह यांच्या मॅनेजर ने सांगितलं कि 'ते गेल्या काही महिन्यांपासून किडनीच्या आजारांनी त्रस्त होते. काही दिवसांपूर्वीच कोलकत्ता यामध्ये त्यांच्यावर किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया झाली होती. डॉक्टरांनी त्यांना दिड महिने आराम करायला सांगितलं होता.


नंतर ते पूर्णपणे बरे होऊन घरी सुद्धा परतले. याशिवाय सतीश सहा यांचे मित्र राकेश बेदी यांनी सांगितले की त्यांना हृदयाशी निगडित ही काही समस्या होत्या. किडनी ट्रान्सप्लांट झाल्यामुळे कदाचित त्यांच्या शरीराला ते मानवल नाही. सतीश यांना निरोप देण्यासाठी पंकज कपूर, रत्ना पाठक, सुप्रिया पाठक, नासिरुद्दीन शाह, रुपाली गांगुली, राजेश कुमार,अनंग देसाई आणि फराह खान यांसारखे सेलिब्रिटी पोहोचले होते. यावेळी सर्वांचेच डोळे पाणावले होते. सतीश शहा याना निरोप देताना अभिनेत्री रुपाली गांगुली खूप रडली. राजेश कुमारलाही अश्रू अनावर झाले होते.

Comments
Add Comment

'मी कट्टर भाजप समर्थक', गंधार जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे विधान चर्चेत!

ठाणे: बालदिनाचे औचित्य साधून प्रख्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्काराने

बिग बॉस विजेती तेजस्वी प्रकाश आता उद्योजिका; करणार 'हा' व्यवसाय

मुंबई : बिग बॉस १५ ची विजेती आणि नागीण मालिकेतून घराघरात पोहोचलेली तेजस्वी प्रकाश आता केवळ अभिनयावर अवलंबून न

राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा

मुंबई : आता आणखी एक सेलिब्रिटी जोडपं म्हणजेच अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री पत्रलेखा यांनीही पॅरेंट्स

‘राम-लीला’ला १२ वर्षे: रणवीर सिंगच्या उत्कटतेने आणि रूपांतराने घडवलेला आयकॉनिक ‘राम’

मुंबई : रणवीर सिंगने साकारलेल्या ‘राम’ या अविस्मरणीय पात्राने प्रेम, अभिनय आणि सिनेमातील तीव्रतेची नव्याने

‘इंडियन आयडॉल’मध्ये अंशिकाच्या परफॉर्मन्सवर शिबानी अख्तरची दाद, म्हणाल्या “रॉक ऑनचा सिक्वेल झाला तर तूच राहशील बँडची लीडर!”

मुंबई : ‘इंडियन आयडॉल’च्या ताज्या विकेंड एपिसोडमध्ये प्रेक्षकांना संगीत, भावना आणि प्रेरणेचा एक सुंदर मेळ

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी अफवा: IFTDA अध्यक्ष अशोक पंडित यांची पापाराझींविरोधात तक्रार

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या आरोग्याविषयी गेल्या काही दिवसांत पसरलेल्या अफवांनी