दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला कोकणाच्या सौंदर्याची भूरळ! विजय देवरकोंडाच्या आगामी चित्रपटाचे रत्नागिरीमध्ये शुटींग सुरू

रत्नागिरी: कोकणातील डोंगररांगा, बारमाही वाहणाऱ्या नद्या, स्थापत्य, संस्कृती यामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्याची भुरळ सर्वांनाच पडते. या नैसर्गिक सौंदर्याला जगासमोर आणण्यासाठी अनेक दिग्दर्शक आपल्या चित्रपटांचे चित्रीकरण कोकणात करतात. आजवर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण कोकणात झाले आहे. मात्र आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला सुद्धा कोकणाच्या सौंदर्याने भूरळ घातली आहे.



दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आगामी चित्रपट 'रावडी जनार्दन'चे चित्रीकरण कोकणातील रत्नागिरी तालुक्यातील सैतवडे गावात सुरु करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीचा नायक विजय देवरकोंडा आणि लोकप्रिय अभिनेत्री कीर्ती सुरेश हे मुख्य चित्रपटात मुख्य भूमिकेत असल्याने त्यांना पाहण्यासाठी गावात प्रचंड गर्दी होत आहे.




मागील दोन दिवसांपासून गावातील गुंबद ग्रामपंचायत हद्दीमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करण्यात आले आहे. चित्रीकरणासाठी मोठा बंदोबस्त सैतवडे गावात दाखल झाला आहे. सैतवडे गावातील दी मॉडेल इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर जिल्हाधिकारी कार्यालयाचा भव्य सेट उभारण्यात आला आहे. सैतवडे येथील चित्रीकरण पूर्ण झाल्यावर पुढील चित्रीकरण गावाशेजारच्या वरवडे येथे होणार आहे.



सैतवडे गावातील बोरसही मोहल्ला येथेही या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. जवळपास साठ ते सत्तर वर्षांपूर्वी सैतवडे गावात 'सागर प्रेमी सैतवडे' या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. त्यानंतर इतक्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा गावात चित्रपट तयार केला जात असल्याने स्थानिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

Comments
Add Comment

Drishyam 3 : कधी येणार अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ चित्रपट ? प्रदर्शनाची तारीख जाहीर

मुंबई : अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला दृश्यम ३ (Drishyam 3) चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

Amitabh Bachchan : स्पर्धकांशी गप्पा मारताना सांगितले अनेक अनुभव

अमिताभ बच्चन हे एक भारतीय चित्रपट निर्माते, अभिनेते, दूरदर्शन सूत्रसंचालक, आणि माजी राजकारणी आहेत. ते त्यांच्या

Deool Band 2 post goes viral : 'देऊळ बंद 2' चित्रपटगृहातून काढण्याचा मोठा निर्णय; दिग्दर्शक प्रवीण तरडेंची पोस्ट व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक, धार्मिक आणि वैचारिक विषयांवर भाष्य करणारे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस

Pradeep Rawat : लगान, गझनीतून चमकलेले; महाभारतातील अश्वत्थामा फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे ७४ व्या वर्षी निधन

मुंबई : लगान, गझनी, छावा अशा अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांतून भूमिका साकारलेले महाभारतातील अश्वत्थामा फेम