मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोटींचे ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर टाकली धाड, मुंबई पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी!

मुंबई: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्स कारखान्यावर छाप टाकत लाखोंचा माल जप्त करण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पेल्हार पोलीसांच्या हद्दीत एमडी नावाचे अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना सुरु असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत या कारखान्यातून एमडी आणि इतर साहित्य असे मिळून एकूण १३.४४ कोटींचा माल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली.


मुंबईच्या टिळकनगर पोलीस ठाण्यातील झोन क्र.६ चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी ही कारवाई केली आहे. प्राथमिक कारवाईत एम. डी. विक्रीसाठी आलेल्या आरोपीला पकडून त्याच्याकडून ५७.८४ ग्रॅम अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. पुढील तपासात त्याच्याशी संबंधित आणखी चार आरोपींना मुंबई व मिरा रोड येथून अटक करण्यात आली. या आरोपींच्या चौकशीतून पालघर जिल्ह्यातील नालासोपारा (पूर्व) येथील रशीद कंपाऊंडमध्ये अंमली पदार्थ निर्मितीचा मोठा कारखाना चालवला जात असल्याची माहिती मिळाली.


या माहितीनुसार मुंबई पोलीसांनी छापा टाकून उत्पादन करणाऱ्या टोळीतील एका प्रमुख आरोपीला अटक केली आणि कारखान्यातून ६.६७५ किलो एम.डी, तसेच निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल व यंत्रसामग्री असा एकूण ₹१३.४४ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे


मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत पेल्हार-रशीद कंपाऊंडमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे,चाळी,कारखाने आहेत. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा आव आणणाऱ्या पालिकेने या बांधकामांकडे दुर्लक्ष केले आहे. पालिकेचा हा निष्काळजीपणा आता चांगलाच भोवला असून दुर्लक्षित झालेल्या या भागात दारुचे आणि अंमली पदार्थांचे अड्डे अशी गुन्हेगारी प्रवृती वाढणाऱ्या घटना घडत असल्याचे या प्रकरणामुळे उघड झाले आहे.


या माहितीच्या आधारे उपायुक्त शेख यांच्या नेतृत्वाखाली रशीद कंपाऊंडमध्ये धाड टाकण्यात आली.रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत या कारखान्यात एमडी तयार केले जाते आणि त्यानंतर ते सर्वत्र पाठवले जात असल्याची माहिती या धाडीत पोलीसांना मिळाली आहे.या कारवाईत ५ जणांना अटक करण्यात आली असून, त्यातील ४ जण मुंबई आणि एक नालासोपारातील असल्याचे समजते. या प्रकरणी सदर कारखाना उभा करणारे बांधकाम ठेकेदार, जागा मालक, महापालिका अधिकारी आणि स्थानिक पोलीस तितकेच जबाबदार असून, त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

Comments
Add Comment

Nashik : आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीय, नाशिक–पुणे रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांचा एल्गार

नाशिक : नाशिक–पुणे रेल्वे हा केवळ वाहतुकीचा नव्हे, तर नाशिकच्या विकासाचा आणि भविष्यातील आर्थिक प्रगतीचा

Nashik : नाशिक जिल्ह्यात 1,148 विद्यार्थ्यांकडून 26 हजार 891 वारकऱ्यांची चरणसेवा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा उपक्रम

Nashik : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत

Casting couch : इंडस्ट्रीमध्ये आधी शारीरिक सुखाची मागणी व्हायची आता, थेट…, अभिनेत्रीने सर्वच सांगून टाकलं

Casting couch : फिल्म इंडस्ट्रीमध्ये करियर करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मेहनतीच्या जोरावर अनेक जण हे शिखर गाठतातही. पण

Skincare tips for monsoon : पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या सोपे उपाय

पावसाळ्यात त्वचा निस्तेज होतेय? या ८ सोप्या टिप्स फॉलो करा आणि त्वचा ठेवा निरोगी व चमकदार (Skincare tips for monsoon)   चेहरा

आमिर खानच्या तिसऱ्या पत्नीचा पहिला नवरा कोण ? तुम्हांला माहिती आहे का ? गौरी स्प्रॅटच्या एक्स हजबंडबद्दल जाणून घ्या

Gauri Spratt Ex-Husband : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक

Healthy Food for Rainy Season : पावसाळ्यात 'हे' हेल्दी आणि टेस्टी पदार्थ नक्की ट्राय करा; चवही मिळेल आणि आरोग्यही राहील उत्तम!

मुंबई: पावसाळा म्हटलं की गरमागरम भजी, वडे, समोसे आणि चहाचा कप अशीच अनेकांच्या मनातली पहिली इच्छा असते. मात्र, या