मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोटींचे ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर टाकली धाड, मुंबई पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी!

मुंबई: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्स कारखान्यावर छाप टाकत लाखोंचा माल जप्त करण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पेल्हार पोलीसांच्या हद्दीत एमडी नावाचे अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना सुरु असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत या कारखान्यातून एमडी आणि इतर साहित्य असे मिळून एकूण १३.४४ कोटींचा माल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली.


मुंबईच्या टिळकनगर पोलीस ठाण्यातील झोन क्र.६ चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी ही कारवाई केली आहे. प्राथमिक कारवाईत एम. डी. विक्रीसाठी आलेल्या आरोपीला पकडून त्याच्याकडून ५७.८४ ग्रॅम अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. पुढील तपासात त्याच्याशी संबंधित आणखी चार आरोपींना मुंबई व मिरा रोड येथून अटक करण्यात आली. या आरोपींच्या चौकशीतून पालघर जिल्ह्यातील नालासोपारा (पूर्व) येथील रशीद कंपाऊंडमध्ये अंमली पदार्थ निर्मितीचा मोठा कारखाना चालवला जात असल्याची माहिती मिळाली.


या माहितीनुसार मुंबई पोलीसांनी छापा टाकून उत्पादन करणाऱ्या टोळीतील एका प्रमुख आरोपीला अटक केली आणि कारखान्यातून ६.६७५ किलो एम.डी, तसेच निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल व यंत्रसामग्री असा एकूण ₹१३.४४ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे


मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत पेल्हार-रशीद कंपाऊंडमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे,चाळी,कारखाने आहेत. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा आव आणणाऱ्या पालिकेने या बांधकामांकडे दुर्लक्ष केले आहे. पालिकेचा हा निष्काळजीपणा आता चांगलाच भोवला असून दुर्लक्षित झालेल्या या भागात दारुचे आणि अंमली पदार्थांचे अड्डे अशी गुन्हेगारी प्रवृती वाढणाऱ्या घटना घडत असल्याचे या प्रकरणामुळे उघड झाले आहे.


या माहितीच्या आधारे उपायुक्त शेख यांच्या नेतृत्वाखाली रशीद कंपाऊंडमध्ये धाड टाकण्यात आली.रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत या कारखान्यात एमडी तयार केले जाते आणि त्यानंतर ते सर्वत्र पाठवले जात असल्याची माहिती या धाडीत पोलीसांना मिळाली आहे.या कारवाईत ५ जणांना अटक करण्यात आली असून, त्यातील ४ जण मुंबई आणि एक नालासोपारातील असल्याचे समजते. या प्रकरणी सदर कारखाना उभा करणारे बांधकाम ठेकेदार, जागा मालक, महापालिका अधिकारी आणि स्थानिक पोलीस तितकेच जबाबदार असून, त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

Comments
Add Comment

MLC Election : विधानपरिषदेच्या १५ जागांवर भाजप वरचढ

 शिवसेना-राष्ट्रवादीकडे केवळ एकेका जागेवर बहुमत; पुण्यात भाजप-राष्ट्रवादीत मोठी चढाओढ मुंबई : विधानपरिषदेच्या

Shiv Thakare :शिव ठाकरेचे मुंबईतील घर पाहिले का? ‘या’ गोष्टींनी वेधले लक्ष

Shiv Thakare Home Tour: फराह खानने बॉलीवूडमध्ये कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच ती अनेक

Yash Dayal : हा माझा निर्णय नव्हता; यश दयालच्या वक्तव्यानं खळबळ, RCB व्यवस्थापनावर अप्रत्यक्ष सवाल

IPL 2026 :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) वेगवान गोलंदाज यश दयाल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आयपीएल २०२६ च्या संपूर्ण

अपघातग्रस्त कामगारांच्याबाबत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या तातडीसाठी उपाययोजना करा; कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई : राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावावा

Mantri Nitesh Rane : हर्षवर्धन सपकाळ यांनी लायकीनुसार बोलावे ! मंत्री नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टीकेला

Divyanka Tripathi Dahiya : लग्नाच्या 10 वर्षांनी प्रेग्नंट दिव्यांका त्रिपाठी, जुळ्या मुलांची झाली आई !

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) आणि अभिनेता विवेक दहिया (Vivek Dahiya) यांच्या आयुष्यात नवा