मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोटींचे ड्रग्स तयार करणाऱ्या कारखान्यावर टाकली धाड, मुंबई पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी!

मुंबई: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील रशीद कंपाऊंडमध्ये ड्रग्स कारखान्यावर छाप टाकत लाखोंचा माल जप्त करण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पेल्हार पोलीसांच्या हद्दीत एमडी नावाचे अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना सुरु असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत या कारखान्यातून एमडी आणि इतर साहित्य असे मिळून एकूण १३.४४ कोटींचा माल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली.


मुंबईच्या टिळकनगर पोलीस ठाण्यातील झोन क्र.६ चे पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी ही कारवाई केली आहे. प्राथमिक कारवाईत एम. डी. विक्रीसाठी आलेल्या आरोपीला पकडून त्याच्याकडून ५७.८४ ग्रॅम अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. पुढील तपासात त्याच्याशी संबंधित आणखी चार आरोपींना मुंबई व मिरा रोड येथून अटक करण्यात आली. या आरोपींच्या चौकशीतून पालघर जिल्ह्यातील नालासोपारा (पूर्व) येथील रशीद कंपाऊंडमध्ये अंमली पदार्थ निर्मितीचा मोठा कारखाना चालवला जात असल्याची माहिती मिळाली.


या माहितीनुसार मुंबई पोलीसांनी छापा टाकून उत्पादन करणाऱ्या टोळीतील एका प्रमुख आरोपीला अटक केली आणि कारखान्यातून ६.६७५ किलो एम.डी, तसेच निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल व यंत्रसामग्री असा एकूण ₹१३.४४ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे


मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत पेल्हार-रशीद कंपाऊंडमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे,चाळी,कारखाने आहेत. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा आव आणणाऱ्या पालिकेने या बांधकामांकडे दुर्लक्ष केले आहे. पालिकेचा हा निष्काळजीपणा आता चांगलाच भोवला असून दुर्लक्षित झालेल्या या भागात दारुचे आणि अंमली पदार्थांचे अड्डे अशी गुन्हेगारी प्रवृती वाढणाऱ्या घटना घडत असल्याचे या प्रकरणामुळे उघड झाले आहे.


या माहितीच्या आधारे उपायुक्त शेख यांच्या नेतृत्वाखाली रशीद कंपाऊंडमध्ये धाड टाकण्यात आली.रात्री १२ ते पहाटे ५ पर्यंत या कारखान्यात एमडी तयार केले जाते आणि त्यानंतर ते सर्वत्र पाठवले जात असल्याची माहिती या धाडीत पोलीसांना मिळाली आहे.या कारवाईत ५ जणांना अटक करण्यात आली असून, त्यातील ४ जण मुंबई आणि एक नालासोपारातील असल्याचे समजते. या प्रकरणी सदर कारखाना उभा करणारे बांधकाम ठेकेदार, जागा मालक, महापालिका अधिकारी आणि स्थानिक पोलीस तितकेच जबाबदार असून, त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

Comments
Add Comment

उल्हासनगरमध्ये गुंडांनी केला पत्रकारावर हल्ला! पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

उल्हासनगर: उल्हासनगरमध्ये गुंडांनी पत्रकारावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प

श्रीवर्धन येथे किनाऱ्यालगत आढळली बोया, मेरिटाईम बोर्डच्या अधिकाऱ्यांनी केला तात्काळ तपास

रायगड: श्रीवर्धन येथील खालचा जीवनाबंदर कोळीवाडा परिसरात पाण्याच्या लाटांसोबत सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

तुळशी विवाह २०२५: जाणून घ्या या परंपरेचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व!

मुंबई : हिंदू धर्मात तुळशी विवाह हा केवळ धार्मिक सोहळा नाही तर तो घरगुती जीवनातील समृद्धी, आरोग्य आणि कुटुंबातील

सतीश शाह यांच्या निधनापूर्वी नक्की काय घडलं ? मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई : हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे काल शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या

दिवाळीनंतर मुंबई–पुणे–कोल्हापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

मुंबई : दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास आता मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठी