भारत – ऑस्ट्रेलिया T20 थरार सुरू: पहिला सामना २९ ऑक्टोबरला!

Ind vs AUS T20 : दिवाळीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांच्या चाहत्यांचे लक्ष आता T20 क्रिकेटवर वळले आहे. २९ ऑक्टोबर रोजी कॅनबेरा येथील मनुका ओव्हलवर पाच सामन्यांची T20 मालिका सुरू होत असून, भारताचे युवा कर्णधार सूर्यकुमार यादव नेतृत्वाखाली संघ सामना खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता, तर आता T20 मालिकेत संघ आपले नशीब बदलण्यासाठी तयार आहेत.


आगामी आयसीसी T20 विश्वचषक २०२६ लक्षात घेता, या मालिकेतील प्रत्येक सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. भारताने गेल्या काही वर्षांत T20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे, यामध्ये आयसीसी T20 विश्वचषक २०२४ आणि आशिया कप २०२५ चा समावेश आहे. मात्र, ऑस्ट्रेलियातील त्यांच्या कामगिरीचे आकडे फारसे चांगले नाहीत, त्यामुळे भारतीय संघासमोर अतिरिक्त आव्हान आहे.



भारत – ऑस्ट्रेलिया T20 मालिका २०२५: सामना वेळापत्रक


१ला T20: २९ ऑक्टोबर – मनुका ओव्हल, कॅनबेरा


  संघ: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत


  वेळ: दुपारी 1:45


२रा T20: ३१ ऑक्टोबर – मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न


  संघ: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत


  वेळ: दुपारी 1:45


३रा T20: २ नोव्हेंबर – बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट


  संघ: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत


  वेळ: दुपारी 1:45


४था T20: ६ नोव्हेंबर – बिल पिपेन ओव्हल, गोल्ड कोस्ट


  संघ: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत


  वेळ: दुपारी 1:45


५वा T20: ८ नोव्हेंबर – द गॅबा, ब्रिस्बेन


  संघ: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत


  वेळ: दुपारी 1:45


भारतीय संघ


सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), रिंकू सिंग आणि वॉशिंग्टन सुंदर.


ऑस्ट्रेलियन संघ


मिच मार्श (कर्णधार) नेतृत्वाखाली ट्रेविस हेड, सीन ॲबॉट, जेवियर बार्टलेट, टिम डेव्हिड, बेन ड्वार्शिस, नाथन एलिस, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), मॅथ्यू कुहनेमन, मिशेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस आणि ॲडम झम्पा सामील आहेत.


आधीच्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत भारताने पर्थ आणि ॲडलेडमध्ये पराभव पत्करला, मात्र सिडनीत अंतिम सामना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या दमदार खेळामुळे ९ विकेट्सने जिंकला. या पराभवाच्या उलटफेरीसाठी आता भारतीय संघ T20 मालिकेत सज्ज झाला आहे, ज्यामध्ये 'कॅप्टन स्काय' सूर्यकुमार यादव युवा संघाचे नेतृत्व करत आहे.


T20 मालिकेचा थरार ८ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून, भारतीय संघाच्या युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी करावी अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.

Comments
Add Comment

टीम इंडियासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान

गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना

IND vs BAN: भारताचा सुपर ओव्हरमध्ये पराभव, हिरो बनण्याच्या प्रयत्नात झिरो झाला कॅप्टन

दोहा : भारताचा (भारत अ) आशिया कप रायझिंग कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव झाला. हा सामना जिंकून

शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर! 'या' खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी

मुंबई : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. ईडन गार्डनवर झालेल्या

स्मृती मानधना-पलाश मुच्छल लग्नाची 'ही' तारीख पंतप्रधानानीचं केली उघड

मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबतची चर्चा अनेक दिवसापासून रंगत होती. मात्र आता त्यांच्या

आज भारत-बांगलादेश सामना; टॉस, वेळ आणि लाइव्ह स्ट्रीमिंग अपडेट

मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यात आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेतील सेमी फायनलचा पहिला सामना २१नोव्हेंबर रोजी

भारताच्या लेकींची सुवर्ण हॅटट्रिक!

जागतिक बॉक्सिंग कप : मीनाक्षी, प्रीती आणि अरुंधतीचा 'गोल्डन पंच' नवी दिल्ली : जागतिक बॉक्सिंग कपच्या अंतिम फेरीत