तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद, भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर समितीने घेतला निर्णय

तुळजापूर : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरची आई तुळजाभवानी ही अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी आहे. याच कारणामुळे या मंदिरात भाविकांची नेहमीच गर्दी असते. लागोपाठ असणाऱ्या सुट्ट्यांमुळे आणि दिवाळीच्या सणामुळे सध्या मंदिरात प्रचंड गर्दी आहे. वाढलेली ही अलोट गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थानाने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिराचा मुख्य दरवाजा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


मुख्य प्रवेशद्वार दोन दिवसासाठी बंद


मंदिर संस्थानाच्या निर्णयानुसार आज (शनिवार ) आणि उद्या (रविवार ) असे दोन दिवस मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार भाविकांसाठी बंद असणार आहे. या दोन दिवसात मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी घाटशीळ बाजूकडून मंदिरात येण्याचा मार्ग खुला करून देण्यात येणार आहे.


२०० रुपयांचे पास बंद


मंदिर संस्थानांकडून आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, तो म्हणजे गर्दीच्या व्यवस्थापनासाठी २०० रुपयांचे पास देखील पुढील २ दिवसांसाठी बंद करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना एकाच रांगेतून दर्शनासाठी जावे लागणार आहे. भाविकांनी मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे आणि शांतता राखून देवीचे दर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर संस्थानाने केले आहे.

Comments
Add Comment

सरकारी नोकरी हवीय? मग 'ही' रेल्वे भरतीची संधी चुकवू नका

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railway) टेक्निशियन पदांसाठी मोठी

Government Employees: सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता ‘स्वग्राम’ बदलण्यासाठी मिळणार अतिरिक्त संधी

 महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सामान्य प्रशासन

Bharat Taxi Service : महाराष्ट्रात लवकरच अॅप आधारित सहकारी टॅक्सी सेवा, 'या' शहरात सुरु होणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आणि टॅक्सी चालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात लवकरच अॅप आधारित

संतापजनक! अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी अन् सलग १० महिने अत्याचार; महाविद्यालयीन तरुणीची तक्रार, चार आरोपी अटकेत

कोल्हापूर (Kolhapur Crime) जिल्ह्यात एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या कथित लैंगिक (Molest) अत्याचाराच्या

Farmers Loan Waiver Maharashtra : महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळाची मंजुरी; ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, पण 'या' पदाधिकाऱ्यांना मिळणार नाही लाभ

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या

KERALA : मान्सून केरळच्या उंबरठ्यावर

पुढील २४ ते ४८ तासांत धडकणार, महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाचा 'यलो अलर्ट' पुणे : कडाक्याच्या उन्हाने हैराण