तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार बंद, भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर समितीने घेतला निर्णय

तुळजापूर : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरची आई तुळजाभवानी ही अनेक कुटुंबांची कुलस्वामिनी आहे. याच कारणामुळे या मंदिरात भाविकांची नेहमीच गर्दी असते. लागोपाठ असणाऱ्या सुट्ट्यांमुळे आणि दिवाळीच्या सणामुळे सध्या मंदिरात प्रचंड गर्दी आहे. वाढलेली ही अलोट गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थानाने भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिराचा मुख्य दरवाजा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


मुख्य प्रवेशद्वार दोन दिवसासाठी बंद


मंदिर संस्थानाच्या निर्णयानुसार आज (शनिवार ) आणि उद्या (रविवार ) असे दोन दिवस मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार भाविकांसाठी बंद असणार आहे. या दोन दिवसात मंदिरात येणाऱ्या भक्तांसाठी घाटशीळ बाजूकडून मंदिरात येण्याचा मार्ग खुला करून देण्यात येणार आहे.


२०० रुपयांचे पास बंद


मंदिर संस्थानांकडून आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, तो म्हणजे गर्दीच्या व्यवस्थापनासाठी २०० रुपयांचे पास देखील पुढील २ दिवसांसाठी बंद करण्यात येणार आहे. यामुळे भाविकांना एकाच रांगेतून दर्शनासाठी जावे लागणार आहे. भाविकांनी मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे आणि शांतता राखून देवीचे दर्शन घ्यावे असे आवाहन मंदिर संस्थानाने केले आहे.

Comments
Add Comment

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Nitesh Rane : ओसरगाव टोलनाक्यावर 'एमएच-०७' वाहनांना टोलमाफी

 पालकमंत्री नितेश राणे यांची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; स्वतंत्र मार्गिका, व्यावसायिक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, दोन चिमुकल्यांसह चालक गंभीर

Buldhana : राज्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पुन्हा एकदा

Forest Minister Ganesh Naik : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशात बिबट सफारी विकसित करणार

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबाच्या धर्तीवर व्याघ्र प्रकल्प मुंबई :

Chhagan Bhujbal : शिवभोजन केंद्र चालकांना दरमहा अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक मंत्री छगन भुजबळ यांचे विधान परिषदेत आश्वासन

बंद शिवभोजन केंद्रे पुन्हा सुरू करण्यास प्राधान्य; निधीसाठी अर्थ विभागाशी चर्चा करणार मुंबई : राज्यातील

Maharashtra Monsoon 2026 : राज्यात २४ ते २७ जूनदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

मुंबई : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण