रत्नागिरीत धक्कादायक घटना, एसटी बसचा आपत्कालीन दरवाजा उघडल्याने महिलेचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर-गणेशखिंड मार्गावर घडलेल्या एका अपघातात एसटी बसचा आपत्कालीन दरवाजा अचानक उघडल्याने बसमधून खाली पडलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. प्रियंका विनोद कुंभार (वय ३५, रा. दहिवली-कुंभारवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून, त्या तीन दिवस मृत्यूशी झुंज देत होत्या.


गुहागर ते रत्नागिरी या मार्गावर रविवारी (१९ ऑक्टोबर) प्रियंका कुंभार या त्यांची मैत्रिण सविता करंजेकर यांच्यासोबत प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान बस गुहागर-गणेशखिंड मार्गावर असताना अचानक एका खोल खड्ड्यात आदळली. या धक्क्याने बसचा आपत्कालीन दरवाजा उघडला आणि प्रियंका कुंभार थेट रस्त्यावर फेकल्या गेल्या. या घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.


अपघातानंतर तातडीने त्यांना चिपळूण येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवस उपचार सुरू होते अखेर त्यांनी प्राण सोडले. त्यांच्या पश्चात पती आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. या दुर्घटनेमुळे कुंभार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दहिवली परिसरात शोककळा पसरली आहे.


या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात एसटी बसचा चालक आणि वाहक यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा दुर्घटना पुन्हा घडू नयेत यासाठी एसटी महामंडळाने तातडीने सुरक्षाविषयक उपाययोजना करावे, अशी मागणी स्थानिक करत आहेत.

Comments
Add Comment

किया इंडियाने कारची वॉरंटी ७ वर्षांपर्यंत वाढवली

मुंबई:किया इंडिया मास प्रीमियम कारमेकरने आपला एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी प्रोग्राम वेईकल डिलिव्‍हरीच्‍या

मराठा सेवा संघाच्या नकुल भोईरची हत्या, पत्नीला अटक

पुणे: पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मराठा सेवा संघ आणि

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.

पुणेकरांसाठी पुन्हा त्रासदायक बातमी; भिडे पूल पुन्हा बंद, नववर्षातच खुला होण्याची शक्यता

पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासातील एक महत्त्वाचा दुवा असलेला बाबाराव भिडे पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

सोन्याचा हार कचऱ्यात गेला; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधाशोध झाली आणि अखेर...

कल्याण : सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा काळात सोनं जपून ठेवणं