Maharashtra Rain Updates : पावसाचा जोर कायम! आज कुठे-कुठे कोसळणार वादळी पाऊस? २५ ते २८ ऑक्टोबर दरम्यान हवामान खात्याचा मोठा इशारा

मुंबई : सध्या दिवसभर जाणवणाऱ्या 'ऑक्टोबर हीट' (October Heat) मुळे नागरिक हैराण झाले असून, राज्यात उकाडा चांगलाच वाढला आहे. मात्र, याच उकाड्यादरम्यान पुण्यासह राज्यातील अनेक भागातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तामिळनाडू (Tamil Nadu), केरळ (Kerala) आणि दक्षिण भारतात (South India) २५ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टीचा (Heavy Rainfall) इशारा देण्यात आला आहे. या भागांसाठी 'रेड अलर्ट' (Red Alert) आणि 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. दक्षिण भारतात होणाऱ्या या तीव्र हवामान बदलाचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर (Maharashtra Weather) होणार आहे. त्यामुळे, राज्यात सध्या जाणवणारा उकाडा कमी होऊन थंडावा (Cooling Effect) येण्याची शक्यता आहे.



'ऑक्टोबर हीट'ला ब्रेक! पुणे आणि मुंबईत पुढील दोन दिवस 'यलो अलर्ट'


ऑक्टोबर हिटमुळे उकाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हवामान विभागाने (Weather Department) एक दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. दिवसभर उकाडा असला तरी दुपारनंतर महाराष्ट्रातील खालील भागांत पाऊस पडू शकतो: तळ कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही पट्टे उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. पुणे (Pune): पुणे शहरात पुढील दोन दिवस 'यलो अलर्ट' (Yellow Alert) देण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून (गुरुवार आणि शुक्रवार) शहरात आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. पुढचे दोन दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतही (Mumbai) पुढील दोन दिवस पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. हवामान खात्याने मुंबईसह राज्यातील अनेक भागांत गडगडाटसह वादळी पाऊस होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.



सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचले; 'यलो अलर्ट' जारी


सोलापूर (Solapur) शहर आणि जिल्ह्यासाठी हवामान विभागाने 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जाहीर केला आहे. काल (शुक्रवार) संध्याकाळपासूनच सोलापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागात पाणी साचल्याचे (Waterlogging) चित्र पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे नागरी वस्तीतही काही प्रमाणात पाणी साचले होते. शहरातील पूर्व भाग, अवंती नगर, वसंत विहार, जुळे सोलापूर, नई जिंदगी या भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. मध्यरात्री महापालिका प्रशासनाकडून पाणी साचणाऱ्या भागात तातडीने कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मध्यरात्रीनंतर पावसाने काहीशी उसंत घेतल्यामुळे सोलापूरकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने सोलापूर जिल्ह्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे. या मुसळधार आणि अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. विशेषतः द्राक्ष बागायतदार (Grape Growers) आणि डाळिंब बागायतदार यांच्या चिंतेत लक्षणीय वाढ झाली आहे, कारण त्यांच्या पिकांना या पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)