किया इंडियाने कारची वॉरंटी ७ वर्षांपर्यंत वाढवली

मुंबई:किया इंडिया मास प्रीमियम कारमेकरने आपला एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी प्रोग्राम वेईकल डिलिव्‍हरीच्‍या तारखेपासून ५ वर्षांवरून जवळपास ७ वर्षांपर्यंत वाढवला आहे. जवळपास ७ वर्षांची नवीन विस्‍तारित वॉरंटी मुदत किया सेल्‍टोस, सोनेट, सिरॉस आणि कॅरेन्‍सच्‍या नवीन व विद्यमान ग्राहकांसाठी आहे, ज्‍यांच्‍याकडे सध्‍या ५ वर्षांची वॉरंटी आहे. आधीच ५-वर्षांच्‍या विस्‍तारित वॉरंटीचा अवलंब केलेले विद्यमान किया ग्राहक ३२१७० रूपयांपासून (कर वगळून) सुरू होणाऱ्या ५+२-वर्ष कव्‍हरेजमध्‍ये अपग्रेड होऊ शकतात. नवीन ग्राहकांसाठी ७ वर्ष विस्‍तारित वॉरंटी ४७२४९ रूपयांपासून (कर वगळून) उपलब्‍ध आहे. देशभरातील कोणत्‍याही अधिकृत किया डिलरशिपमध्‍ये ७-वर्ष विस्‍तारित वॉरंटीचा आनंद घेता येऊ शकतो.


किया इंडियाच्‍या विक्री व विपणनाचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष अतुल सूद म्‍हणाले,'किया इंडिया ग्राहकांसाठी फायदे वाढवण्‍याप्रती आणि परिपूर्ण मन:शांतीची खात्री घेण्‍याप्रती कटिबद्ध आहे. आमचे वॉरंटी कव्‍हरेज नवीन व विद्यमान ग्राहकांसाठी जवळपास ७ वर्षांपर्यंत वाढवत आम्‍ही आमच्‍या वेईकल्‍सचा टिकाऊपणा व दर्जावरील आत्‍मविश्वासाची खात्री देतो, तसेच आमच्‍या अधिकृत सर्विस नेटवर्कच्‍या माध्‍यमातून सतत पाठिंबा देत आहोत. हा उपक्रम प्रत्‍येक किया ग्राहकाला अपवादात्‍मक मालकीहक्‍क अनुभव आणि दीर्घकालीन मूल्य देण्‍याप्रती आमच्‍या विद्यमान कटिबद्धतेचा भाग आहे.''


कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की विविध उपक्रम आणि सर्वोत्तम प्रोग्राम्‍सच्‍या माध्‍यमातून किया इंडियाने सतत सर्वोत्तम ग्राहक सेवा देण्‍याप्रती आपल्‍या कटिबद्धतेचे पालन केले आहे, जेथे विशेषत: देखभाल खर्च आणि भावी रिसेल शक्‍यतेसंदर्भात उत्तम मन:शांती देत आहे.

Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

शिक्षकांसह मुख्याध्यापकाकडून होणाऱ्या मानसिक छळामुळे शौर्यची आत्महत्या

शिक्षण व्यवस्थेतील मानसिक छळाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत नवी दिल्ली (वृत्तसंस्था): प्राचार्या आणि

नेपाळमध्ये पुन्हा पेटलं जेन झी चं आंदोलन

काठमांडू : नेपाळमध्ये पुन्हा जेन झी आंदोलन पेटलं आहे. देशातील तरुणाई पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. परिस्थिती

शाहिन, मुझम्मिलने बॉम्बसाठी ‘अल-फलाह’तून चोरले केमिकल

नवी दिल्ली : बॉम्ब बनवण्यासाठी विद्यापीठाच्या प्रयोगशाळेतून रसायने चोरली होती, असा कबुली जबाब फरिदाबादच्या

मालेगावच्या बालिकेवर अत्याचार, सर्वत्र संताप; अभिनेत्री सुरभी भावेकडून कठोर शिक्षेची मागणी

मालेगाव : मालेगावजवळील डोंगराळे गावात घडलेल्या निर्घृण घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. साडेतीन

राज्यभरातील व्यापाऱ्यांचा ५ डिसेंबरला लाक्षणिक बंद

पुणे (प्रतिनिधी) : राज्यभरातील व्यापारी विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ डिसेंबर २०२५ रोजी