लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन सुधारते असा विश्वास आहे. पण तज्ज्ञांचे मत आहे की, या दाव्यात तथ्य नाही. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टच्या मते, लिंबू पाण्याचे योग्य प्रकारे सेवन करणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते, परंतु त्याचा ‘मॅजिक पोशन’ म्हणून विचार करणे योग्य नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की लिंबू पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि पचनास मदत करण्यासाठी उपयुक्त आहे, परंतु ते थेट शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकत नाही किंवा थेट चरबी कमी करू शकत नाही.



लिंबू पाणी पिण्याचे फायदे :


१. लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
२. हायड्रेशन आणि पचनसाठी हे एक चांगले पेय आहे.
३. त्याची आंबट चव ज्यांना साधे पाणी पिणे आवडत नाही त्यांच्यासाठी साध्या पाण्याचा एक चांगला पर्याय बनवते.
४. लिंबाच्या रसातील आम्ल पोटाला पाचक एंजाइम तयार करण्यास मदत करू शकते.
५. लाळेच्या उत्पादनास देखील उत्तेजन देते.



प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न फायदा :


लिंबू सरबताचा फायदा प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न असू शकतो. लिंबू सरबताचे प्रमाण आणि वेळ लक्षात घेणे ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. दिवसातून फक्त एकदा किंवा दोनदा लिंबू सरबत पिणे हिताचे ठरू शकते.



लिंबाच्या पाण्यामुळे थेट वजन कमी होते ?


लिंबाच्या पाण्यामुळे थेट वजन कमी होते असा एक सामान्य समज आहे, परंतु तज्ज्ञ या गोष्टीशी सहमत नाहीत. हे पेय प्यायल्याने आपल्याला पोट भरल्यासारखे वाटू शकते आणि जर आपण ते गोड पदार्थाशिवाय प्यायले तर ते आपल्यातल्या एकूण कॅलरीचे प्रमाण कमी करू शकते. तज्ज्ञांनी यावर जोर दिला आहे की हे पेय चरबी कमी करणारे नाही. ज्या लोकांना आधीपासूनच अ‍ॅसिडीटी , जठराची सूज किंवा अल्सर यासारख्या समस्या आहेत त्यांनी लिंबाचे पाणी पिताना सावधगिरी बाळगली पाहिजे. लिंबामधील सायट्रिक ऍसिड पोटाच्या आतील अस्तराला त्रास देऊ शकते. ज्यांना आधीच आंबटपणा किंवा छातीत जळजळ होण्याची समस्या आहेत त्यांच्यासाठी लिंबाचे पाणी हे नुकसानकारक ठरू शकते.

Comments
Add Comment

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर