महाराजांच्या किल्ल्याची विटंबना! सिगारेट, दारूच्या बाटल्या आणि कंडोम आढळल्याने शिवप्रेमी आक्रमक

जंजिरे धारावी किल्ल्यावर कचऱ्याचा आणि अश्लीलतेचा विळखा; दुर्गप्रेमींचा प्रशासनावर संतापाचा 'बुलडोझर'


'आंदोलन छेडणार' - किल्ला जतन समितीचा थेट इशारा


भाईंदर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारशाची विटंबना! भाईंदर पश्चिमेकडील महत्त्वाचा जंजिरे धारावी किल्ला सध्या दारूच्या बाटल्या, सिगारेट पाकिटे आणि कंडोम सारख्या अश्लील कचऱ्याचे केंद्र बनला आहे. किल्ल्याची झालेली ही दयनीय अवस्था आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष पाहून दुर्गप्रेमी आणि शिवभक्तांचा संताप शिगेला पोहोचला आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जंजिरे धारावी किल्ला जतन समितीने नुकतीच किल्ल्याच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी समोर आलेल्या विदारक दृश्याने शिवप्रेमींच्या भावनांना मोठा धक्का बसला. किल्ल्याच्या परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे, कंडोम कव्हर्स आणि इतर अस्वच्छ वस्तूंचा ढीग आढळला.

प्रशासनावर टीकेची झोड


ज्या किल्ल्यावर दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो, त्याच किल्ल्याची ही दुर्दशा पाहून शिवप्रेमींनी प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केवळ कार्यक्रम करणारे लोक, गडकिल्ल्यांच्या प्रत्यक्ष संवर्धनाकडे का दुर्लक्ष करतात?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

किल्ल्यावर रात्रीच्या वेळी लाईट बंद असल्याने अंधार असतो, अस्वच्छता आहे आणि सुरक्षारक्षकांचा अभाव आहे. त्यामुळेच हे ऐतिहासिक ठिकाण सध्या अयोग्य आणि गैरकृत्य करणाऱ्या तरुणांचे अड्डा बनले आहे.

वारंवार मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष


जंजिरे धारावी किल्ला जतन समितीचे श्रेयस सावंत यांनी आरोप केला आहे की, समितीने यापूर्वीही मीरा-भाईंदर महानगरपालिका, स्थानिक आमदार आणि वारसा संवर्धन विभागाकडे किल्ल्यावर सुरक्षारक्षक नेमणे आणि वीजपुरवठा सुरू करणे अशा मूलभूत मागण्या केल्या होत्या. मात्र, प्रशासनाने या मागण्यांकडे अद्यापही अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.

प्रशासनाच्या या निष्क्रियतेविरोधात संतप्त झालेल्या जंजिरे धारावी किल्ला जतन समितीचे मयूर ठाकूर यांनी थेट इशारा दिला आहे की, “जंजिरे धारावी किल्ल्याच्या संरक्षण, स्वच्छता आणि सुरक्षेची योग्य व्यवस्था करण्यात आली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन छेडू.”

हा किल्ला केवळ ऐतिहासिक वारसा नसून, शहराच्या संस्कृतीचा आत्मा आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने या विषयाची गंभीर दखल घेऊन किल्ल्याचे संवर्धन करावे, अशी मागणी आता आक्रमकपणे जोर धरू लागली आहे.
Comments
Add Comment

Parth Pawar : विरोध असलेल्या VSR कंपनीच्या विमानातून पार्थ पवार यांनी केला प्रवास

मुंबई : राष्ट्रीवादीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हळहळाला.

West Bengal Election 2026 : पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान झाले सुरू

कोलकाता: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू झाले आहे. मतदान केंद्रांबाहेर

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह