काळाचौकी परिसरात प्रियकराने हल्ला केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई: मुंबईत प्रियकराने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. काळाचौकी परिसरात २४ ऑक्टोबर, २०२५ रोजी सकाळच्या सुमारास मनीषा यादव हिच्यावर तिचा प्रियकर सोनू बराय याने चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने मनिषाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मनिषावर हल्ला केल्यानंतर सोनूने स्वत:चे जीवन संपवले होते.


प्रियकराने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनिषावर सुरुवातीला केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या जखमा गंभीर असल्यामुळे तिला जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील लालबाग काळाचौकी परिसरात मनिषा यादव हिला सोनू बराय याने रस्त्यात बेदम मारहाण करून तिच्यावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यानंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मनिषा जवळच असलेल्या आस्था नर्सिंग होममध्ये गेली. मात्र सोनू याने नर्सिंग होममध्ये घुसून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. तसेच स्वतःचाही गळा चिरला. या घटनेनंतर त्या दोघांनाही तात्काळ केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी सोनू बराय याची तपासणी करताच मृत घोषित केले.



आंबेवाडी येथे राहणारा सोनू बराय या २४ वर्षीय तरुणाचे याच परिसरात राहणाऱ्या मनिषासोबत प्रेमसंबंध होते. मात्र आठ दिवसांपूर्वी मनिषाचे अन्य कुणासोबत अफेयर असल्याचा संशयावरून दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रेकअप झाल्यानंतर सोनू मानसिक तणावात होता. याच तणावात असताना त्याने सकाळी मनिषाला भेटायला बोलावून तिच्यासोबत वाद घातला आणि नंतर तिच्यावर चाकूने वार केले. तसेच स्वतःचेही जीवन संपवले.

Comments
Add Comment

मागासवर्गीय शासकीय वसतिगृहांना महापुरुषांची नावे देण्याचा सामाजिक न्याय विभागाचा निर्णय

मुंबई : सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांना

भाजपाध्यक्ष राज्यसभेवर जाणार, भाजपचे राज्यसभेचे नऊ उमेदवार जाहीर

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने अर्थात भाजपने बिहारमधून आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार म्हणून

पश्चिम आशियातील संघर्षावर भारताने दिली अधिकृत प्रतिक्रिया

नवी दिल्ली : इराण आणि आखाती प्रदेशात २८ फेब्रुवारी २०२६ पासून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सुरू झाल्याचे समजताच

मध्य पूर्वेतल्या बदलत्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत ऊर्जेसंदर्भात पूर्णपणे सज्ज

विविध स्रोतांकडून कच्चे तेल आणि पेट्रोलियम खरेदी, पुरवठ्याच्या स्थितीवर देखरेखीसाठी 24×7 नियंत्रण कक्ष नवी

फुलांची होळी उपक्रमातून महापौर रितू तावडे यांनी दिला पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश

मुंबई : होळी व धुळवड/रंगपंचमी हे सण आनंदात साजरे करावेत आणि त्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे सामाजिक

उत्तर महाराष्ट्रात उबाठाची 'मशाल' विझली

माजी खासदार उन्मेष पाटील शिवसेनेच्या वाटेवर; ६ मार्चला मुंबईत पक्ष प्रवेश होणार मुंबई : राजकारणात 'मैत्री' आणि