बंगळुरू-हैदराबाद महामार्गावर भीषण बस अपघात, २० जणांचा मृत्यू; जयंत कुशवाहाचा थरकाप उडवणारा अनुभव

हैदराबाद : बंगळुरू-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी पहाटे भीषण अपघात घडला. प्रवाशांनी भरलेल्या बसने अचानक पेट घेतल्याने २० जणांचा मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले. मृत्यूच्या दारातून थोडक्यात सुटलेला जयंत कुशवाहा याने या भीषण प्रसंगाचा थरकाप उडवणारा अनुभव सांगितला.


कुशवाहा म्हणाला, पहाटे साधारण २.३० वाजता बसमध्ये धूर दिसू लागला. काही क्षणांतच आग भडकली. आम्हाला वाटलं बसचा अपघात झाला आहे. बाहेर पाहिलं तेव्हा समोर आणि मागे ज्वाळा उठत होत्या. सर्व प्रवासी झोपेत होते, फक्त काही जण जागे होते. आम्ही सर्वांना ओरडून जागं केलं आणि बाहेर पडायचा प्रयत्न सुरू केला. मात्र मुख्य दरवाजा बंद होता.


कुशवाहा पुढे म्हणाला, मी बसच्या मध्यभागी सीट क्रमांक U-7 वर होतो. खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला, पण ती अडकली होती. शेवटी आम्ही एकत्र येऊन मागची खिडकी तोडण्याचा प्रयत्न केला. बुक्के, लाथा मारून काचेची खिडकी फोडली आणि वरून उडी मारली. बसमध्ये धूर पसरत होता, श्वास घेणंही कठीण झालं होतं. आम्ही विचार न करता उडी मारली काही डोक्यावर तर काही पाठीवर पडले. पण जिवंत बाहेर पडलो हेच नशिब.


कुशवाहाच्या मते, मागून सुमारे ११ प्रवासी बाहेर आले, तर काही ड्रायव्हरच्या बाजूची खिडकी फोडून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याने तत्काळ अग्निशमन दलाला बोलावले. काही मिनिटांतच बचावकार्य सुरू झाले. जखमींना तातडीने बेंगळुरू आणि हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.


या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, बसचा इंजिन भाग ओव्हरहिट झाल्यामुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी