बंगळुरू-हैदराबाद महामार्गावर भीषण बस अपघात, २० जणांचा मृत्यू; जयंत कुशवाहाचा थरकाप उडवणारा अनुभव

हैदराबाद : बंगळुरू-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी पहाटे भीषण अपघात घडला. प्रवाशांनी भरलेल्या बसने अचानक पेट घेतल्याने २० जणांचा मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले. मृत्यूच्या दारातून थोडक्यात सुटलेला जयंत कुशवाहा याने या भीषण प्रसंगाचा थरकाप उडवणारा अनुभव सांगितला.


कुशवाहा म्हणाला, पहाटे साधारण २.३० वाजता बसमध्ये धूर दिसू लागला. काही क्षणांतच आग भडकली. आम्हाला वाटलं बसचा अपघात झाला आहे. बाहेर पाहिलं तेव्हा समोर आणि मागे ज्वाळा उठत होत्या. सर्व प्रवासी झोपेत होते, फक्त काही जण जागे होते. आम्ही सर्वांना ओरडून जागं केलं आणि बाहेर पडायचा प्रयत्न सुरू केला. मात्र मुख्य दरवाजा बंद होता.


कुशवाहा पुढे म्हणाला, मी बसच्या मध्यभागी सीट क्रमांक U-7 वर होतो. खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला, पण ती अडकली होती. शेवटी आम्ही एकत्र येऊन मागची खिडकी तोडण्याचा प्रयत्न केला. बुक्के, लाथा मारून काचेची खिडकी फोडली आणि वरून उडी मारली. बसमध्ये धूर पसरत होता, श्वास घेणंही कठीण झालं होतं. आम्ही विचार न करता उडी मारली काही डोक्यावर तर काही पाठीवर पडले. पण जिवंत बाहेर पडलो हेच नशिब.


कुशवाहाच्या मते, मागून सुमारे ११ प्रवासी बाहेर आले, तर काही ड्रायव्हरच्या बाजूची खिडकी फोडून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर एका पोलिस अधिकाऱ्याने तत्काळ अग्निशमन दलाला बोलावले. काही मिनिटांतच बचावकार्य सुरू झाले. जखमींना तातडीने बेंगळुरू आणि हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.


या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्राथमिक माहितीनुसार, बसचा इंजिन भाग ओव्हरहिट झाल्यामुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Comments
Add Comment

Vapi Chemical Units : वापी औद्योगिक वसाहतीला युद्धाचा विळखा! कच्चे तेल आणि कच्च्या मालाचे दर भडकल्याने उत्पादन कोलमडले

वापी : पश्चिम आशियात (इराण-अमेरिका-इस्रायल) भडकलेल्या युद्धाच्या ज्वाला केवळ त्या भूप्रदेशापुरत्या मर्यादित न

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे