दोन वर्षीय चिमुकलीवर गुन्हा दाखल; पोलिसांवर प्रश्नचिन्ह

कल्याण : कल्याणनजीक असलेल्या मोहने येथे फटाके फोडण्याच्या वादातून काल दोन गटात झालेल्या राड्याप्रकरणी एका दोन वर्षाच्या मुलीला आरोपी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दोन्ही गटांच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी एका गटाच्या गुन्ह्यात चिमुकलीवर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.




या घटनेत जखमी असलेल्या संध्या साठे यांनी सांगितले की, त्यांच्यासह अनेकांना एका गटाकडून मारहाण झाली. आमच्यापैकी जखमींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमींमध्ये आमच्यासोबत असलेली एक दोन वर्षांची मुलगीदेखील होती. पोलिसांनी या दोन वर्षांच्या मुलीलाही गुन्ह्यात आरोपी केले आहे. ही बाब जेव्हा आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले तेव्हा वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.



या प्रकरणात पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, त्यापैकी पाच जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर तीन जणांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Nashik : वणी येथे मंडप काढताना विजेचा धक्का लागून मंडप व्यावसायिकाचा मृत्यू

दिंडोरी : वणी येथे लग्नाचा मंडप काढण्यासाठी गेलेल्या मंडप व्यावसायिकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

Nashik : नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी महावितरणाची 'तारीख पे तारीख'; मंत्री भुजबळांच्या शिफारस पत्राला महावितरणकडून केराची टोपली

Nashik : लोकप्रतिनिधींच्या पत्रालाही किंमत नाही आणि सामान्य जनतेच्या हक्काचीही दखल घेतली जात नाही, असा संतापजनक

Badlapur Accident : भरधाव BMW रस्त्यावर पलटली; भीषण अपघातात दोन जण ठार

बदलापूर : बदलापूर (Badlapur) परिसरात रविवारी पहाटे झालेल्या भीषण रस्ते अपघातात (Accident) दोन तरुणांचा मृत्यू (Death) झाला असून

Kolhapur : कोल्हापुरात नवीन उद्योगांना बळ

 ४७.६३ हेक्टर शासकीय गायरान जमीन एमआयडीसीला; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ

Pandarpur Mandir : पंढरपूर मंदिरातील लेपन प्रक्रियेवरील स्थगिती अर्ज न्यायालयाने नाकारला

सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींवर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार करण्यात येणाऱ्या लेपन

Monsoon Delay : जिल्ह्यात ३० जूनपर्यंत जलतरण तलाव बंद

अलिबाग : जिल्ह्यातील उष्ण व दमट हवामान, मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब, कमी पर्जन्यमान आणि उपलब्ध जलसाठ्यातील