सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झालेला विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार, सोशल मीडियात चर्चा

अ‍ॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना अ‍ॅडलेड येथे सुरू आहे. या सामन्यात तसेच आधी झालेल्या पर्थमधील सामन्यात विराट कोहली शून्य धावा करुन बाद झाला. सलग दोन एकदिवसीय सामन्यात विराट कोहली शून्य धावा करुन बाद झाला.लागोपाठ दोन वेळा अपयशी ठरलेला विराट कोहली कसोटी आणि टी २० पाठोपाठ एकदिवसीयक्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियात सुरू झाली आहे.





विराट कोहली १७ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच लागोपाठच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये शून्य धावा करुन बाद झाला आहे. अ‍ॅडलेडच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झेवियर बार्टलेटने विराटला बाद केलं. सुरुवातीपासूनच कोहली क्रीझवर संघर्ष करताना दिसत होता. त्याच्या खेळात आत्मविश्वासाची कमतरता जाणवत होती. त्यामुळे आता कोहलीसाठी ही मालिका निर्णायक ठरू शकते, कारण भारत सध्या संघ बांधणीच्या टप्प्यात आहे.

ज्या अ‍ॅडलेडच्या मैदानावर कोहलीने अनेक अविस्मरणीय खेळी केल्या आहेत त्याच ठिकाणी तो अपयशी झाला. पण चाहत्यांनी त्याच्या आतापर्यंतच्या कामगिरीची आठवण ठेवून कोहली पॅव्हेलियनमध्ये जात असताना उभं राहून आदराने टाळ्या वाजवल्या.


आता मालिकेत फक्त एकच सामना उरला असून, कोहलीसमोर स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची हीच संधी आहे. अन्यथा, भारतीय संघात बदलाच्या काळात त्याला जागा टिकवणे कठीण ठरू शकते. सलग दोन ‘डक’नंतर विराटला या मालिकेतील शेवटच्या सामन्यात मोठी खेळी करणे गरजेचे आहे, अन्यथा हा नकोसा विक्रम त्याच्या कारकिर्दीवर काळी छाया टाकू शकतो.

Comments
Add Comment

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या