रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, अक्षर पटेलसह तळाचे फलंदाज चमकले; भारताने ऑस्ट्रेलियापुढे ठेवले एवढे मोठे आव्हान


अ‍ॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पर्थमध्ये झालेला पहिला सामना ऑस्ट्रेलियाने सात गडी राखून डकवर्थ लुईस नियमानुसार जिंकला. आता अ‍ॅडलेड येथे सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ५० षटकांत नऊ बाद २६४ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियापुढे ५० षटकांत २६५ धावा करण्याचे आव्हान ठेवले. या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने ५९ वे तर श्रेयस अय्यरने २३ वे अर्धशतक केले. रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर व्यतिरिक्त अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप, वॉशिंग्टन सुंदर यांनी झटपट धावा करुन सांघिक कामगिरीत महत्त्वाचे योगदान दिले.





कर्णधार शुभमन गिल नऊ धावा करुन आणि विराट कोहली शून्य धावा करुन परतल्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११८ धावांची भागिदारी रचली. रोहित आणि श्रेयस यांच्यामुळे भारताचा डाव सावरला. पण एका टप्प्यावर रोहित आणि श्रेयस बाद झाले. यानंतर अक्षरने सूत्रं हाती घेतली. नंतर तळाच्या फलंदाजांपैकी हर्षित राणा, अर्शदीप, वॉशिंग्टन सुंदर यांनी झटपट धावा वाढवल्या. यामुळे भारताने २५० धावांचा टप्पा ओलांडला.



भारताकडून रोहित शर्माने ९७ चेंडूत ७३ धावा, श्रेयस अय्यरने ७७ चेंडूत ६१ धावा आणि अक्षर पटेलने ४१ चेंडूत ४४ धावा केल्या. केएल राहुलने ११, वॉशिंग्टन सुंदरने १२, नितीश रेड्डीने ८, हर्षित राणाने नाबाद २४, अर्शदीपने १३, मोहम्मद सिराजने नाबाद शून्य धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून झम्पाने चार तर बार्टलेटने तीन आणि स्टार्कने दोन विकेट घेतल्या.





Comments
Add Comment

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा

हरमनप्रीत कौरकडे संघाची धुरा मुंबई (प्रतिनिधी) : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धा संपल्यानंतर भारतीय महिला संघ

मुंबईत कुस्तीची महादंगल!

चार राज्यातले दिग्गज पैलवान भिडणार मुंबई : पहिल्यांदाच देशातील चार बलाढ्य कुस्ती राज्यांमधील अव्वल पैलवान एकाच

न्यूझीलंडविरुद्धच्या रायपूर टी २० मध्ये भारताचा विजय, मालिकेत २-० अशी आघाडी

रायपूर : भारताने न्यूझीलंडविरुद्धची रायपूरमधील टी २० मॅच सात विकेट राखून जिंकली. या विजयासह भारताने पाच मॅचच्या