"मला कधी लग्न करायचं नव्हतं पण..." पॉलाच्या एका मेसेजनं बदललं सारंगचं आयुष्य

पुणे : भारतीय डिजिटल पार्टी (भाडिपा) या लोकप्रिय मराठी यू ट्यूब चॅनलचा संस्थापक आणि अभिनेता सारंग साठे याने त्याची प्रेयसी पॉला हिच्याशी २८ सप्टेंबर रोजी लग्नगाठ बांधली. अनेक वर्षांपासून एकत्र असलेल्या या जोडप्याने आतापर्यंत एक कागद आमचं नातं ठरवू शकत नाही अशी भूमिका घेत लग्न न करता प्रेमाने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अखेर त्यांनी साधेपणाने विवाह केला आणि यामागचं कारण त्यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे.


भाडिपाच्या यू ट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पॉला आणि सारंग यांनी त्यांच्या या निर्णयामागील भावनिक प्रसंग उघड केला. पॉलाने सांगितले की, साधारण वर्षभरापूर्वी पॅरिसहून मुंबईला येताना तिचं विमान इराकजवळ आलं होतं. यानंतर विमान वळविण्याचा निर्णय झाला. पायलटने जाहीर केलं की इराणने इस्त्रायलवर हल्ला केला असून पुढे जाणं शक्य नाही. या घटनेमुळे ती घाबरली आणि सारंगला काहीही झालं तरी मी तुझ्यावर प्रेम करते असा मेसेज पाठवला.



त्या क्षणी पॉलाला जाणवलं की, आयुष्यात काहीही घडू शकतं आणि आपल्याला आवडत्या व्यक्तीसोबत आयुष्याचं पुढचं पाऊल टाकायला हवं. त्यामुळेच तिने सारंगसमोर लग्नाची इच्छा व्यक्त केली. पॉलाची भावनिक अवस्था पाहून सारंगनेही तत्काळ लग्नाचा निर्णय घेतला.


दोघांनीही अत्यंत साधेपणाने विवाह केला. नंतर भाडिपा टीमने ऑफिसमध्येच मराठमोळ्या पद्धतीने छोटेखानी समारंभ आयोजित करून त्यांना सरप्राइज दिलं. या विवाहाबद्दल चाहत्यांकडून आणि सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

सणाचा खरा आनंद लुटत जॅकलिनने साजरा केला ख्रिसमस!

मुंबई: देशभरात सर्वत्र ख्रिसमसची तयारी सुरू असून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने सणाचा खरा उत्साह आणि

अल्लू अर्जुन–त्रिविक्रम यांची ग्रँड कमबॅक, मायथॉलॉजिकल एपिकमध्ये हिट जोडी पुन्हा एकत्र

१000 कोटींच्या महाप्रकल्पात अल्लू अर्जुन आणि त्रिविक्रम यांच्या रीयुनियनची तयारी आपण अशा एका मोठ्या बातमीबद्दल

दीपिकाच्या आठ तास कामाच्या अटीवर कियाराची प्रतिक्रिया, मातृत्वाबद्दल काय सांगतेय अभिनेत्री?

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने आई झाल्यावर सिनेसृष्टीत आठ तासांच्या कामाची मागणी केल्यामुळे बऱ्याच

आयुष आणि अनुष्काची ‘जब्राट’ जोडी पडद्यावर

छोट्या पडद्यावरील मालिकेमधून घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही

धुरंधर स्टार रणवीर सिंगचे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने यांनी भरभरून कौतुक केले, जाणून घ्या त्यांना “ज्वालामुखी” का म्हटले

धुरंधर बॉक्स ऑफिसवर सातत्याने शानदार कामगिरी करत आहे आणि आता एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे की रणवीर सिंगबाबत