बिग बींच्या जावयाचा जुहूमध्ये २८ कोटींचा आलिशान फ्लॅट...

मुंबई : मुंबईतील जुहू येथील आलिशान अपार्टमेंटची तब्बल २८ कोटी रुपयांना विक्री झाली आहे. गुरुवारी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी हा व्यवहार झाला. या आलिशान अपार्टमेंटचे मालक हे बिझनेसमन निखिल नंदा आहेत. निखिल नंदा म्हणजे प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांचे जावई आहेत.


निखिल नंदा यांनी जुहूमध्ये घेतलेल्या या नवीन अपार्टमेंटची किंमत २८.३९ कोटी रुपये आहे. या व्यवहारासाठी १. ७० कोटींचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्युटी) भरण्यात आले. यामध्ये निखिल नंदाची बहीण नताशा नंदा यांनी पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी वापरून हा व्यवहार केला. घराचे क्षेत्रफळ ३१३९ चौरस फूट असून ४११ चौरस फुटांची टेरेस देखील आहे. त्यामुळे एकूण जागा सुमारे ३५५० चौरस फूट होते. या अपार्टमेंटसोबत तीन गाड्यांसाठी पार्किंगची जागा देखील आहे.



कोण आहेत निखिल नंदा ?


निखिल नंदा हे एस्कॉर्ट्स कुबोटा लिमिटेडचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. ते आधी दिल्लीत राहत होते, पण त्यांचा मुलगा अगत्स्य आणि मुलगी नव्यनवेली नंदा हे मनोरंजन विश्वात सक्रिय होत असल्यामुळे आता मुंबईत जास्त वेळ घालवत आहेत. यासाठी त्यांनी जुहूत नवे घर विकत घेतले आहे. अगत्स्यने अलिकडेच 'द आर्चीज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.


निखिल नंदा हे अमिताभ बच्चनचे जावई, अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय यांचे मेहुणे, तर श्वेता नंदा यांचे पती. याशिवाय त्यांची दुसरी ओळखही आहे. निखिल नंदा हे दिवंगत अभिनेत्री आणि निर्मात्या रीतू नंदा आणि राजन नंदा यांचे पुत्र आहेत. रीतू नंदा या महान अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते राज कपूर यांच्या कन्या होत्या. त्यामुळे निखिल नंदा हे कपूर कुटुंबाचे देखील सदस्य आहेत. निखिल आणि श्वेता यांना अगत्स्य नंदा आणि नव्यानवेली नंदा अशी दोन मुले आहेत. पूर्वी हे कुटुंब दिल्लीत राहत होते. मात्र, आता अगत्स्य आणि नव्या दोघेही त्यांच्या कामामुळे मुंबईत जास्त दिसतात.


Comments
Add Comment

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

Amitabh Bachchan : स्पर्धकांशी गप्पा मारताना सांगितले अनेक अनुभव

अमिताभ बच्चन हे एक भारतीय चित्रपट निर्माते, अभिनेते, दूरदर्शन सूत्रसंचालक, आणि माजी राजकारणी आहेत. ते त्यांच्या

Deool Band 2 post goes viral : 'देऊळ बंद 2' चित्रपटगृहातून काढण्याचा मोठा निर्णय; दिग्दर्शक प्रवीण तरडेंची पोस्ट व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक, धार्मिक आणि वैचारिक विषयांवर भाष्य करणारे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस

Pradeep Rawat : लगान, गझनीतून चमकलेले; महाभारतातील अश्वत्थामा फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे ७४ व्या वर्षी निधन

मुंबई : लगान, गझनी, छावा अशा अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांतून भूमिका साकारलेले महाभारतातील अश्वत्थामा फेम

Salman Khan : सलमान खानच्या वजनात मोठी घट, अखेर सत्य आलं समोर

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. आता तो