Vasai Fort : 'मला मराठी येत नाही!' म्हणत वसई किल्ल्यावर सुरक्षा रक्षकाचा माज; शिवरायांच्या वेशातील युवकाला फोटो काढण्यास मज्जाव!

पालघर : वसईच्या ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ल्यावर (Vasai Fort) दीपोत्सवाच्या (Deepotsav) शुभदिनी एक अनपेक्षित आणि वादग्रस्त घटना घडली.यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पोशाख परिधान करून आलेल्या एका युवकास तेथील सुरक्षा रक्षकाने फोटो काढण्यास मज्जाव (Prohibited from taking photos) केला. एवढेच नव्हे तर, या सुरक्षा रक्षकाने त्या युवकाला हिंदीतून बोलण्याचा आग्रह धरला. सुरक्षा रक्षकाने आपल्याला मराठी भाषा येत नाही असे स्पष्टपणे सांगत, एका प्रकारे माज दाखवण्याचा प्रयत्न केला. यामुळे शिवरायांच्या वेशभूषेत आलेल्या त्या युवकाचा संताप अनावर झाला. त्यानंतर, मराठी भाषेचा अपमान करणाऱ्या आणि हिंदीचा आग्रह धरणाऱ्या त्या सुरक्षा रक्षकाला युवकाने चांगलेच फैलावर घेतले. या घटनेमुळे ऐतिहासिक किल्ल्यावर मराठी भाषेचा आदर आणि स्थानिक अस्मिता या विषयांवर चर्चा सुरू झाली आहे.



नेमकं काय घडलं?




'मला मराठी येत नाही' म्हणणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा शिवरायांच्या वेशातील तरुणाने उतरवला माज


दिवाळीच्या लक्ष्मीपूजन (Lakshmi Puja) दिवशी वसईच्या ऐतिहासिक किल्ल्यावर (Vasai Fort) झालेल्या दीपोत्सव (Deepotsav) कार्यक्रमादरम्यान हा वादग्रस्त प्रसंग घडला. 'किल्ले वसई मोहीम परिवार' आणि 'अनाम प्रेम महाराष्ट्र' यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात शेकडो दिवे लावून ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमात अनेक तरुणांनी शिवकालीन पोशाख परिधान करून सहभाग नोंदवला होता. त्यावेळी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखात आलेल्या एका युवकाला तेथील सुरक्षा रक्षकाने हटकले. त्या सुरक्षा रक्षकाने त्या तरुणाला हिंदीतून बोलण्याचा आग्रह धरला आणि "मला मराठी येत नाही" असे बोलून माज दाखवण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकाच्या या भूमिकेमुळे शिवरायांच्या वेशात आलेल्या युवकाचा पारा चढला. त्याने हिंदीचा आग्रह धरणाऱ्या सुरक्षा रक्षकाला चांगलेच झापले. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तो युवक स्पष्ट शब्दांत म्हणताना दिसतो, "मराठी येत नाही का तुला? मराठी आलीच पाहिजे, मराठी येत नाही म्हणायचा आणि माज दाखवायचा हे चालणार नाही!" मराठी भाषेबद्दल आदर राखण्याचे स्पष्ट मत मांडत त्या युवकाने या सुरक्षा रक्षकाचा माज उतरवला. ही घटना सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा घडवून आणत आहे.



'महाराजांच्या गड-किल्ल्यांवर अशी मनाई खपवून घेणार नाही!'


छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत वसई किल्ल्यावर (Vasai Fort) आलेल्या युवकाने, आपल्याला फोटो काढण्यास मज्जाव करणाऱ्या आणि हिंदीचा आग्रह धरणार्‍या सुरक्षा रक्षकाला ठाम शब्दांत सुनावले. युवकाने सुरक्षा रक्षकाला खडसावून विचारले, "छत्रपतींच्या वेशात आल्यावर फोटो काढण्यास मज्जाव का करता? महाराजांच्या गड-किल्ल्यांवर (Forts) अशी मनाई आम्ही खपवून घेणार नाही." या संपूर्ण प्रसंगामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठी भाषेचा अपमान: सुरक्षारक्षकांकडून स्थानिक मराठी भाषेचा अपमान होत आहे का? महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान (Respect for Marathi Language) राखला जातो का? या घटनेला 'दुःखद बाब' मानून अनेक नागरिकांनी सोशल मीडियावर युवकाच्या ठाम भूमिकेचे कौतुक केले आहे. एका उद्ध्वस्त संसाराला पुन्हा सजीव करण्याचा संकल्प आहे,” असं या उपक्रमाचं सार सांगत धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आता नव्या उमेदीनं नवजीवनाचं स्वागत करत आहेत.

Comments
Add Comment

Raigad News : रायगड जिल्ह्यात नियम पूर्तता करणाऱ्या दगडखाणींना उत्खननाची परवानगी: महसूल मंत्री

मुंबई :  आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या खाणींना सरसकट बंदी न घालता उत्खननासाठी परवानगी द्यावी, मात्र

Nashik MNC Forced Conversion Case : नाशिकमध्ये नामांकित कंपनीत तरुणींचा धर्मांतरासाठी छळ; नमाज आणि बीफ खाण्याचा दबाव

नाशिक : मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना उघडकीस आली आहे. एका

Deputy Collectors : राज्यातील ५१ तहसीलदार होणार उपजिल्हाधिकारी

महसूल विभागात हालचाली; 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हुकणार? मुंबई :

Eknath Shinde : निवडणुका संपल्या आता पक्ष वाढीवर भर द्या; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील संपर्क प्रमुखांना निर्देश

मतदार याद्यांचे बारकाईने पुनरावलोकन करण्याचा सूचना लोकप्रतिनिधींनीही कार्यकर्ता म्हणून पक्ष संघटनेत योगदान

शिवसेनेचे संघटनात्मक बळकटीकरण व सक्षमीकरण पर्व सुरू

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या संघटनबांधणीचा नवा टप्पा आकार घेत आहे. शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे

Mankhurd : मानखुर्द येथील सरकारी जमिनीवरील बाराशे अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा, तब्बल अकरा एकर जमीन अतिक्रमणमुक्त उपनगरचे सह पालकमंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या पाठपुराव्याला यश

निष्कासित जागांवर विधायक उपक्रम, नागरिकांसाठी उभारणार अत्याधुनिक 'विज्ञानपार्क' मुंबई