Akola News : पाडव्याआधीच 'काळाचा घाला'! ऐन दिवाळीत भीषण अपघातात पती-पत्नीसह तिघे ठार; अकोल्यात शोककळा

अकोला : संपूर्ण राज्यासह देशभरात दिवाळीचा (Diwali) उत्साह ओसंडून वाहत असताना, अकोल्यात मात्र लक्ष्मीपूजनाच्या रात्री एका भीषण अपघातामुळे सणाला गालबोट लागले. अकोला – नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) पैलपाडा गावाजवळ ही अत्यंत दुःखद घटना घडली. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या चार जणांना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली आणि त्यांना चिरडले. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये अश्विनी शिरसाट आणि धिरज शिरसाठ या पती-पत्नीचा समावेश आहे, तसेच आरिफ खान यांनाही आपला जीव गमवावा लागला. तर, अन्वर खान हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात (Government Hospital) उपचार सुरू आहेत. सणासुदीच्या दिवशीच तिघांवर काळाने घाला घातल्यामुळे सर्वत्र प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे आणि मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.



बंद पडलेल्या कारजवळ अपघात: नेमकं काय घडलं?


अकोला – नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पैलपाडा गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगावमंजू येथील रहिवासी असलेले धीरज सिरसाट आणि अश्विनी सिरसाट हे जोडपे त्यांचे काम आटोपून त्यांच्या चारचाकी गाडीने (Four-wheeler) घरी परतत होते. रस्त्यात अचानक त्यांची कार बंद पडली. त्यानंतर त्यांनी मदतीसाठी फोन केला आणि त्यांची बंद पडलेली कार एका मालवाहू गाडीने (Goods Vehicle) टोचन (Towing) करून नेली जात होती. पैलपाडा गावाजवळ पोहोचल्यानंतर, गाडीतून चौघे जण खाली उतरले. ते रस्त्याच्या बाजूला उभे राहून गाडीचे टायर्स (Tyres) तपासत होते. नेमक्या याच वेळी, अमरावतीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात गाडीने त्यांना जोराची धडक दिली आणि त्यांना चिरडले. धडक इतकी जबर होती की, चौघेही गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. या अपघातात धीरज सिरसाट आणि अश्विनी सिरसाट या दांपत्यासह आरिफ खान (सर्व बोरगावमंजूचे रहिवासी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, चौथा व्यक्ती अन्वर खान हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर अकोल्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गंभीर अपघाताप्रकरणी बोरगावमंजू पोलिस अधिक तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Sangli School Van Accident : धक्कादायक! स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; पाच वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू

सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यातून आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय मुलीचा जागीच

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राला ‘इनोव्हेशन हब’ बनविण्यासाठी युवा कल्पनांना व्यासपीठ देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· ‘द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६’चे चौथे पर्व घोषित · ३० नामांकित व्यवस्थापन व सार्वजनिक धोरण संस्थांमधील

Maharashtra News : राज्यातील प्रत्येक विभागात भव्य लोककला महोत्सव; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्रातील लोककला आणि लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी आता राज्याच्या प्रत्येक विभागात भव्य

ST Employees Salary : एसटीच्या 86 हजार कर्मचाऱ्यांना दिलासा; 11 ऑगस्टला खात्यात जमा होणार जुलैचे वेतन

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन 11 ऑगस्ट रोजी

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून