राष्ट्रपती मुर्मूंच्या हेलिकॉप्टर लँडिंगवेळी जमीन खचली: मोठा अपघात टळला!

केरळ : केरळमधील पथनमथिट्टा जिल्ह्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगवेळी एक मोठा अपघात थोडक्यात टळला. प्रमादोम स्टेडियममध्ये तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरल्यावर त्या ठिकाणी काँक्रीटचा एक भाग खचला आणि मोठा खड्डा तयार झाला. या घटनेने सुरक्षा यंत्रणांमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.


सुदैवाने, त्या वेळी राष्ट्रपती हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. तातडीने पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी हस्तक्षेप करत हेलिकॉप्टर सुरक्षितपणे त्या ठिकाणाहून बाहेर काढले.


प्रमादोम स्टेडियममध्ये हेलिपॅड तातडीने बांधण्यात आले होते. आधी निलक्कल येथे लँडिंगचे नियोजन होते, मात्र खराब हवामानामुळे जागा बदलण्यात आली. परिणामी, मंगळवारी रात्रीच हेलिपॅडचे काम पूर्ण करण्यात आले होते. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, काँक्रीट योग्य प्रकारे न सुकल्याने ते हेलिकॉप्टरचे वजन सहन करू शकले नाही आणि जमिनीत खड्डा पडला.


या तांत्रिक अडथळ्यानंतरही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दौरा पुढे सुरु राहिला. त्यांनी सबरीमाला मंदिरात दर्शन घेतले आणि आरतीसही सहभागी झाल्या. पुढील कार्यक्रमानुसार त्या २३ ऑक्टोबर रोजी तिरुवनंतपुरम येथे माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील आणि शिवगिरी मठात श्री नारायण गुरू यांच्या महासमाधी शताब्दी समारंभाचे उद्घाटन करतील. २४ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती एर्नाकुलम येथील सेंट टेरेसा कॉलेजच्या शताब्दी समारंभात उपस्थित राहणार आहेत.

Comments
Add Comment

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१