झुबीन गर्गनंतर संगीत क्षेत्राला आणखी एक धक्का

नवी दिल्ली : गायक आणि अभिनेता ऋषभ टंडन (३५) याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पापाराझी (सेलिब्रेटींचा पाठलाग करुन त्यांच्याविषयीची बित्तंबातमी मिळवणारे) विरल भयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन ही माहिती दिली.

प्राथमिक वृत्तानुसार, ऋषभ टंडन त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी दिल्ली येथे आला होता. दिल्लीतच त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचे निधन झाले. ऋषभ करिअरसाठी मुंबईत वास्तव्यास होता. शांत आणि मनमिळाऊ स्वभावामुळे तो लोकप्रिय झाला होता. संगीत क्षेत्रात तो स्वतःचे स्थान निर्माण करत होता. अभिनयाच्या क्षेत्रात 'फकीर - लिविंग लिमिटलेस' आणि 'रशना: द रे ऑफ लाईट' या चित्रपटांमध्ये त्याने केलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते.

ऋषभ टंडनला त्याच्या 'फकीर' या गाण्याने लोकप्रियता मिळवून दिली. त्याच्या लोकप्रिय गाण्यांमध्ये 'ये आशिकी' , 'चांद तू', 'धू धू कर के', आणि 'फकीर की जुबानी' यांचा समावेश आहे. आणखी काही गाणी प्रदर्शित व्हायची आहेत. पण आधीच ऋषभचा मृत्यू झाला. यामुळे ते काम आता अपूर्णच राहणार आहे.

Comments
Add Comment

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

Amitabh Bachchan : स्पर्धकांशी गप्पा मारताना सांगितले अनेक अनुभव

अमिताभ बच्चन हे एक भारतीय चित्रपट निर्माते, अभिनेते, दूरदर्शन सूत्रसंचालक, आणि माजी राजकारणी आहेत. ते त्यांच्या

Deool Band 2 post goes viral : 'देऊळ बंद 2' चित्रपटगृहातून काढण्याचा मोठा निर्णय; दिग्दर्शक प्रवीण तरडेंची पोस्ट व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक, धार्मिक आणि वैचारिक विषयांवर भाष्य करणारे चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस

Pradeep Rawat : लगान, गझनीतून चमकलेले; महाभारतातील अश्वत्थामा फेम अभिनेते प्रदीप रावत यांचे ७४ व्या वर्षी निधन

मुंबई : लगान, गझनी, छावा अशा अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांतून भूमिका साकारलेले महाभारतातील अश्वत्थामा फेम

Salman Khan : सलमान खानच्या वजनात मोठी घट, अखेर सत्य आलं समोर

मुंबई : बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सलमान खान सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. आता तो