अफगाणिस्तानने पाकिस्तानमध्ये अचूक फेकला 'टोमॅटो बॉम्ब'

पाकिस्तानमध्ये टोमॅटाचा भाव गगनाला भिडला, एक किलोसाठी मोजावे लागत आहेत ७०० रुपये!


कराची : भारतात झालेल्या अतिवृष्टीमुळे सध्या देशभरातील भाज्यांचे दर कडाडले असले तरी एक किलो भाजीसाठी शंभरच्या आत रुपये मोजावे लागत आहेत. मात्र पाकिस्तानमधील टोमॅटोचा भाव ऐकला तर तुम्हाला धक्का बसेल. पाकिस्तानमध्ये सध्या एक किलो टोमॅटोसाठी ७०० रुपये मोजावे लागत आहेत. यातून अफगाणिस्तानने व्यापाराच्या माध्यमातून पाकिस्तानवर चांगलाच निशाणा साधल्याचे दिसते.


पाकिस्तानच्या स्थानिक वृत्तानुसार, पाकिस्तानमधील मोक्याच्या शहरांमध्ये टोमॅटोचा भाव आता गगनाला भिडला आहे. सध्या टोमॅटो विक्रमी ७०० रुपये किलोने विकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य पाकिस्तानी माणसांचे बजेट पार कोलमडून गेले आहे.


पाकिस्तानच्या अनेक भागांना सध्या अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसलेला आहे.त्यामुळे अनेक भागातील पीक संपूर्णपणे नष्ट झाले आहे. त्यातच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील सीमेवरील संघर्षामुळे अफगाणिस्तानने टोमॅटोची निर्यात थांबवली आहे. टोमॅटोप्रमाणे इतर भाजीपाला सुद्धा सीमेवरूनच परत पाठवण्यात येत आहे. त्याचा फटका पाकिस्तानमधील अनेक शहरांना बसत आहे.


एका व्यापाऱ्याने समा टीव्हीला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, पाकिस्तान सरकारने तातडीने इराणमधील टोमॅटो मागवले आहे. पण इराणवरून टोमॅटो पाकिस्तानमध्ये येईपर्यंत किती ताजे असतील असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल