एकदिवसीय महिला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी तीन संघाची लागणार ताकद, भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान

मुंबई: क्रिकेट विश्वातील एकदिवसीय महिला विश्वचषकच्या यावर्षीच्या स्पर्धेत आतापर्यंत २२ सामने पार पडले आहेत. हा २२वा सामना दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात पार पडल्यानंतर गुणतालिकेतील चित्र बदलले असून स्पर्धेतून पाकिस्तान आणि बांग्लादेश हे दोन संघ बाद झाले आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीच्या एका जागेसाठी आता तीन संघात चुरस रंगणार आहे. ज्यात भारतीय महिलांचा संघदेखील सहभागी आहे.


उपांत्य फेरीसाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंडने आपली जागा पक्की केली आहे. आता उपांत्य फेरीसाठी केवळ एक जागा शिल्लक असून त्यावर भारत, न्युझीलंड आणि श्रीलंका यांच्यात एका जागेसाठी जोरदार लढत होणार आहे. भारताचे अजून दोन सामने शिल्लक आहे. जर भारताने दोनही सामने जिंकले तर भारतीय संघ उपांत्य फेरीत जागा निर्माण करू शकतो.


उपांत्य फेरीसाठी भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना होणार आहे. या सामन्यात जर भारताने न्यूझीलंडचा पराभव केला तर उपांत्य फेरीत भारताचे स्थान निश्चित होईल. अन्यथा बांग्लादेशसोबतच्या सामन्यात भारताला विजय मिळवणे अनिवार्य असेल. भारताने जर बांग्लादेशसोबत विजय मिळवला तर न्यूझीलंडसमोर इंग्लंडचे आव्हान उभे राहणार आहे. ज्यात न्यूझीलंडची हार झाली तर भारतीय संघाला उपांत्य फेरीत जाण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.

Comments
Add Comment

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत

U19 Asia Cup Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रेसह प्रशिक्षकांवरही कारवाई होणार; पाकविरुद्ध फायनलमध्ये दारुण पराभव होताच BCCI अ‍ॅक्शन मोडवर!

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात झालेल्या दारुण पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामक