दिवसा कडक ऊन, रात्री थंडी! ऑक्टोबर हिटमुळे आरोग्याची काळजी कशी घ्याल?

मुंबई: पावसाळ्यानंतर आता पुणेसह संपूर्ण महाराष्ट्रात 'ऑक्टोबर हिट'ने जोर धरला आहे. दिवसा कडक उन्हाळा आणि रात्री अचानक गारठा जाणवल्यामुळे वातावरणात तीव्र चढ-उतार होत आहेत. या अचानक बदलत्या हवामानामुळे नागरिकांना सर्दी, ताप, खोकला आणि डोकेदुखीसारखे संसर्गजन्य आजार वाढले आहेत.



ऑक्टोबर हिटमुळे आजार वाढले


सध्या दिवाळीच्या खरेदीच्या गर्दीमुळे बाजारपेठा गजबजलेल्या आहेत. या गर्दीतून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संसर्गाचा धोका वाढतो आणि रुग्णांची संख्या लवकर वाढू लागली आहे. त्यामुळे दवाखान्यांमध्येही रुग्णांची गर्दी वाढत असून, वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.


ऑक्टोबर हिटमुळे वातावरणात दिसणारी लक्षणेही विशेष आहेत. दिवसा तीव्र उष्णता जाणवते, संध्याकाळी थोडा गारवा निर्माण होतो, तर रात्री थंडीचा कडाका जाणवतो. पहाटे धुक्याचा फटका आणि थंडीची तीव्रता अधिक जाणवते, मात्र सूर्योदयानंतर लगेचच उन्हाचा प्रकोप सुरु होतो. या तीव्र चढ-उतारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.



आरोग्याची कशी घ्याल काळजी?



  1. शक्यतो फ्रीजमधील पाणी आणि आईस्क्रीम टाळावे.

  2. पाणी उकळून प्यावे.

  3. तळलेले पदार्थ खाणे कमी करावे.

  4. बाहेर फिरताना नाक आणि तोंडाला रुमाल बांधावा.

  5. दुचाकीवर प्रवास करताना देखील नाक-तोंडाचे रक्षण करणे गरजेचे आहे.


या साध्या खबरदारीने ऑक्टोबर हिटच्या बदलत्या हवामानातून निर्माण होणाऱ्या आजारांपासून बचाव करता येईल.

Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.