भारतीय अवकाश संशोधनातील सोन्याचे पान काळाच्या पडद्याआड, डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन

मुंबई: भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस यांचे आज बुधवार, २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या १०१ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. सॅटेलाइट टीव्हीच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश देशाच्या कोपऱ्याकोपऱ्यात पोहोचवण्यात प्रा.एकनाथ वसंत चिटणीस यांचा सिंहाचा वाटा आहे. २६ जुलै २०२५ ला त्यांनी आपला शतकमहोत्सवी वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या कार्यासाठी त्यांना पद्मभुषणसह इतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.


डॉ. एकनाथ चिटणीस यांनी भारतीय अंतराळ संशोधनाचा पाया रचणाऱ्या डॉ. विक्रम साराभाई यांच्या सोबत सहकारी म्हणून काम केले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत डॉ. अब्दुल कलाम यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवायची याचा निर्णयही चिटणीस यांनी घेतला होता. श्रीहरीकोटा येथील अग्निबाण प्रक्षेपण केंद्राची जागा त्यांनीच निश्चित केली होती.


१९५० मध्ये पुण्यातील इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये विक्रम साराभाईंचे प्रेरणादायी भाषण ऐकून त्यांनी फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कॉस्मिक किरणांवरील संशोधनासाठी सेरेन्कॉव्ह काउंटर तयार केला आणि पुढे एमआयटीमध्ये प्रा. ब्रुनो रॉसी यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. १९६१ मध्ये साराभाईंनी भारतात परत बोलावल्यावर चिटणीस यांनी देशातील पहिली सॅटेलाइट टेलिमेट्री स्टेशन उभारले. तसेच थुंबा रॉकेट लॉंचिंग स्टेशनची निवड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९६३ मध्ये भारताच्या पहिल्या Nike Apache रॉकेटच्या उड्डाणाचे त्यांचे स्वप्न साकार झाले.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने