दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नटरंगच्या १५ वर्षांनंतर येणार हा नवा चित्रपट ; दिगदर्शक रवी जाधव यांची घोषणा

मुंबई : नटरंग हा मराठी चित्रपट २०१० मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. चित्रपटातील गाणी आणि लावणी याची आजही प्रेक्षकांना भुरळ पडते. नटरंग चित्रपटाचे दिग्दर्शन रवी जाधवने केले होते आणि निर्मिती झी स्टुडिओजची होती. या अभूतपूर्व यशाला १५ वर्षे पूर्ण होत असतानाच नव्या चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे. दिग्दर्शक रवी जाधव आणि त्यांची टीम २०२६ मध्ये एक नवा चित्रपट घेऊन येत आहे. 'फुलवरा' असे या चित्रपटाचे नाव आहे. रवी जाधव यांनी सोशल मीडियातून नव्या चित्रपटाची घोषणा केली. नव्या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.


तमाशा फडावरचे कलाकार मंचावर येऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. पण त्यांचं खरं आयुष्य हे पडद्यामागे आहे आणि ते अतिशय अस्वस्थ करणारे असे आहे. यावर प्रकाश टाकणारे 'द फोक आख्यान' हा लोककलाविष्कार बघितला. त्या सादरीकरणाने भारावलेल्या रवी जाधव यांनी याच विषयावर चित्रपट निर्मिती करण्याचा विचार सुरू केला, त्यातूनच 'फुलवरा' हा चित्रपट जन्माला आला.


'द फोक आख्यान' या बद्दल बोलताना रवी जाधव म्हणाले, हे ज्याच्या लेखन आणि निवेदनांन सजलं आहे त्या ईश्वर अंधारेचा या विषयावरचा अभ्यास हा थक्क करणारा आहे. आणि हर्ष- विजय या तरुण जोडगोळीला असलेली संगीताची जाण ही सुद्धा कौतुकास्पद आहे. या तरुणांची लोककलेवरची श्रद्धा, माझं या कलेप्रती असलेलं प्रेम आणि गाठीशी असलेला थोडाफार अनुभव एकत्र आला आणि फुलवराची गोष्ट निर्माण झाली. अश्या प्रकारची गोष्ट जर लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर झी स्टुडिओज पेक्षा दुसरं उत्तम माध्यम नाही. त्यामुळे आम्ही नटरंग नंतर जवळपास १५ वर्षांनी एकत्र काम करणार आहोत. दिवाळी हा सण परंपरा जपणारा आहे, साजरा करणारा आहे त्यामुळे या दिवाळीचा शुभ मुहूर्त साधून आम्ही या सिनेमाची घोषणा केली.


'फुलवरा' या चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन रवी जाधव यांचे असून कथा - पटकथा आणि संवाद, गाणी ही ईश्वर ताराबाई अंधारे यांचे आहेत. संगीत हर्ष - विजय यांचं असून निर्मिती उमेशकुमार बन्सल, बवेश जानवेलकर ( झी स्टुडिओज) आणि मेघना जाधव ( अथांग कॉम्युनिकेशन ) यांची आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत कोणते कलाकार असतील हि गोष्ट अद्याप गुलदस्त्यात आहे आणि ही गोष्ट जाणून घेण्यात प्रेक्षक उत्सुक आहेत. पुढल्या वर्षीच्या दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Comments
Add Comment

Samarth Panel : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनेलचा दणदणीत विजय

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या

CINTAA : रणवीर सिंग-फरहान अख्तर वादावर CINTAA अध्यक्ष पूनम ढिल्लों यांची स्पष्टोक्ती; 'कलाकारांना कामगार म्हणून अधिकृत मान्यता मिळवणे हेच आमचे ध्येय'

NAVI MUMBAI : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यातील अलीकडील वादाच्या पार्श्वभूमीवर CINTAA च्या अध्यक्षा

Janhavi kapoor :वजन कमी करण्यासाठी जान्हवी कपूरने दिला सल्ला; म्हणाली…

वजन वाढणे किंवा वजन कमी होणे या समस्यांचा अनेकांना सामना करावा लागतो. बदलती जीवनशैली आणि आरोग्याच्या विविध

Sairat :आकाश सोबतच्या पोस्टवर अखेर रिंकू राजगुरूने स्वत: केला खुलासा !

सैराट चित्रपटामुळे मराठी चित्रपटसृष्टिला एक वेगळी दिशा मिळाली. जगभरात १०० कोटींची कमाई करणारा 'सैराट' हा पहिला

Ranveer singh :धुरंधर फेम बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग वरील बंदी प्रकरणी FWICE चा खुलासा

मुंबई : धुरंधर फेम बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग वर बॉलिवूडने बंदी घालण्यात आल्याचे वृत्त आले. या प्रकरणी आता

Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal : चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून नीलम शिर्केंची माघार

मुंबई : 'अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा'च्या (Akhil Bharatiya Marathi Chitrapat Mahamandal) ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांचा पत्ता कट