कोकणातील राजकारणातून महत्त्वाची बातमी ! उबाठा गटाचा नेता भाजपच्या वाटेवर, सामंतांचा गौप्यस्फोट

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटातील नेता भाजपमध्ये येणार असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी मतदार संघात ठाकरे गटाकडून लढलेले उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने हे भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रयत्नशील आहेत, असे उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. त्यामुळे रत्नागिरीच्या राजकरणात खळबळ निर्माण झाली आहे.


विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे गटाला एकामागून एक असे धक्के बसले आहेत. राज्यभरातील अनेक नेत्यांनी उबाठा गटाला 'जय महाराष्ट्र' करत महायुतीतील घटक पक्षांमध्ये प्रवेश केलाय. यामध्ये आता रत्नागिरी मतदारसंघातील नेताही भाजपमध्ये जाणार आहे. यामुळे रत्नागिरीच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.




उदय सामंत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, "विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीतून ठाकरे गटाकडून लढलेले उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने हे भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रयत्नशील आहे. त्यांच्या भाजप प्रवेशासाठी हालचाली सुरू आहेत," असा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना सामंत म्हणाले की, "महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. योग्य वेळी आमचे तीन नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तो जाहीर करतील. त्यामुळे विधानसभेप्रमाणे आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील मोठं यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे

Comments
Add Comment

Revenue Minister Chandrashekhar Bawankule : महिला बचत गटांना देणार अडीच एकर जमीन

 महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; पडीक जमिनी वापरखाली आणण्यासाठी निर्णय मुंबई : राज्यातील ग्रामीण

Operation Tiger : मंत्रिपदाच्या हट्टामुळे अडले 'ऑपरेशन टायगर'?

 ४ खासदार उत्सुक; मराठवाड्यातील 'त्या' नेत्याला लॉटरी लागण्याची शक्यता मुंबई : उबाठा गटातील अंतर्गत अस्वस्थतेचा

Cabinet Meeting : मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारूनही शंभूराज देसाईंच्या मनाविरुद्ध घडले

 सातारा-सांगली विधान परिषद निवडणूक; महायुतीच्याच उमेदवाराला मतदान करण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश मुंबई :

Cabinet meeting : नगरसेवकांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; नागपूरमध्ये हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रोन प्रकल्पाची स्थापना मुंबई : राज्यभरातील

Cabinet meeting : ग्रामीण महाराष्ट्रात पाणीपट्टीचा दर आता किमान १५० रुपये

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; 'ग्रामीण पेय जल धोरण २०२६ जाहीर' मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना

MLA Manda Mhatre : आमदार मंदा म्हात्रेंकडून मंत्री गणेश नाईकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

मुंबई : नवी मुंबईतील भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि वर्चस्वाची लढाई मुख्यमंत्र्यांच्या दारात पोहोचली आहे. भाजप