कोकणातील राजकारणातून महत्त्वाची बातमी ! उबाठा गटाचा नेता भाजपच्या वाटेवर, सामंतांचा गौप्यस्फोट

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटातील नेता भाजपमध्ये येणार असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी मतदार संघात ठाकरे गटाकडून लढलेले उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने हे भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रयत्नशील आहेत, असे उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. त्यामुळे रत्नागिरीच्या राजकरणात खळबळ निर्माण झाली आहे.


विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे गटाला एकामागून एक असे धक्के बसले आहेत. राज्यभरातील अनेक नेत्यांनी उबाठा गटाला 'जय महाराष्ट्र' करत महायुतीतील घटक पक्षांमध्ये प्रवेश केलाय. यामध्ये आता रत्नागिरी मतदारसंघातील नेताही भाजपमध्ये जाणार आहे. यामुळे रत्नागिरीच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.




उदय सामंत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, "विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीतून ठाकरे गटाकडून लढलेले उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने हे भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रयत्नशील आहे. त्यांच्या भाजप प्रवेशासाठी हालचाली सुरू आहेत," असा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना सामंत म्हणाले की, "महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. योग्य वेळी आमचे तीन नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तो जाहीर करतील. त्यामुळे विधानसभेप्रमाणे आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील मोठं यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे

Comments
Add Comment

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिला राज्यसभा खासदारकीचा राजीनामा

रिक्त जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक; छगन भुजबळ केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांना वेग मुंबई : राज्याच्या

West Bengal Election 2026 : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार उसळला; निवडणूक आयोगाचा कडक इशारा

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार आणि तोडफोडीच्या

Thalapathy Vijay : थलपती विजय ‘किंगमेकर’च्या शोधात!

चेन्नई : थलपती विजय यांच्या तमिलगा वेत्री कळघम (टीव्हीके) पक्षाने तमिळनाडूमध्ये इतिहास रचला. द्रविडी

Manoj Tiwary : मनोज तिवारी यांचा तृणमूल काँग्रेसला रामराम

पश्चिम बंगाल : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि तृणमूल काँग्रेसचे नेते मनोज तिवारी यांनी मंगळवारी पक्षाला रामराम

Mamata Banerjee : हा पराभव नाही, तर लोकशाहीचा... पराभवानंतर ममता दीदींचा आक्रमक पवित्रा; राजीनामा देण्यास ठाम नकार

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तृणमूल

Kalita Majhi : दुसऱ्यांच्या घरात धुणी भांडी करणारी महिला थेट आमदार; कलिता माझी यांची बंगालच्या निवडणुकीत मोठी झेप

पश्चिम बंगाल (West Bangal Election 2026) विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, राज्याच्या राजकीय इतिहासात मोठी