कोकणातील राजकारणातून महत्त्वाची बातमी ! उबाठा गटाचा नेता भाजपच्या वाटेवर, सामंतांचा गौप्यस्फोट

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटातील नेता भाजपमध्ये येणार असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत रत्नागिरी मतदार संघात ठाकरे गटाकडून लढलेले उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने हे भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रयत्नशील आहेत, असे उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. त्यामुळे रत्नागिरीच्या राजकरणात खळबळ निर्माण झाली आहे.


विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे गटाला एकामागून एक असे धक्के बसले आहेत. राज्यभरातील अनेक नेत्यांनी उबाठा गटाला 'जय महाराष्ट्र' करत महायुतीतील घटक पक्षांमध्ये प्रवेश केलाय. यामध्ये आता रत्नागिरी मतदारसंघातील नेताही भाजपमध्ये जाणार आहे. यामुळे रत्नागिरीच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.




उदय सामंत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, "विधानसभा निवडणुकीत रत्नागिरीतून ठाकरे गटाकडून लढलेले उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने हे भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रयत्नशील आहे. त्यांच्या भाजप प्रवेशासाठी हालचाली सुरू आहेत," असा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.


दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना सामंत म्हणाले की, "महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. योग्य वेळी आमचे तीन नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तो जाहीर करतील. त्यामुळे विधानसभेप्रमाणे आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील मोठं यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे

Comments
Add Comment

Ajit Pawar Birth Anniversary : अजित पवारांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभरात 'जनसेवा सप्ताह'

- प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती; २२ ते २६ जुलै या कालावधीत आयोजन मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार

Maharashtra Monsoon Session 2026 : अधिवेशनाला येणाऱ्या मंत्री, आमदारांनाही पावसाचा फटका; कामकाज स्थगित

- रस्ते, रेल्वे मार्ग बंद, विमान सेवा विलंबाने, अनेकांनी मतदारसंघात राहणे केले पसंत मुंबई : मुंबईसह राज्यभरात सुरू

Navanath Ban : 'रामरक्षा नव्हे, पक्षरक्षा सुरू'; संजय राऊतांवर नवनाथ बन यांचा घणाघात

- महाभारतात संजय हा दुर्योधन आणि कौरवांच्या बाजूने होता मुंबई : भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन (Navanath Ban)

‘६ जुलै’ला विधिमंडळाचे कामकाज ठप्प होण्याचा अजब योगायोग

 ६५ वर्षांच्या इतिहासातील तिसरी घटना; १९६१ आणि २०१८ मध्ये नागपुरात झाली होती ‘बत्ती गूल’ मुंबई : निसर्गाचा

Girish Mahajan : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेसह जुना महामार्ग पूर्णपणे बंद; धबधब्यांवर जाणं टाळा, अन्यथा…मंत्री गिरीश महाजन यांचा कडक इशारा

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा धक्का! निकटवर्तीय चंद्रिमा भट्टाचार्यांचा टीएमसीतील सर्व पदांचा राजीनामा; बंगालच्या राजकारणात खळबळ

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अडचणीत सापडलेल्या