पाकचा कर्णधार बदलाचा सिलसिला सुरूच! मोहम्मद रिझवानकडून वनडे कर्णधारपद काढून घेतले


लाहोर: पाकिस्तान क्रिकेटमध्ये कर्णधार बदलाचा खेळ पुन्हा एकदा सुरू झाला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान याला एकदिवसीय क्रिकेटच्या कर्णधारपदावरून अचानक हटवले आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याला संघाचा नवा वनडे कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.


मोहम्मद रिझवानने गेल्या वर्षी (२०२४) ऑक्टोबरमध्ये बाबर आझमच्या राजीनाम्यानंतर वनडे आणि टी-२० संघाची कमान स्वीकारली होती. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने काही मालिका जिंकल्या असल्या तरी, या वर्षातील (२०२५) संघाची कामगिरी, विशेषतः वेस्ट इंडिजमधील मालिका पराभव आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधून लवकर बाहेर पडणे, या पार्श्वभूमीवर पीसीबीने कर्णधारपद बदलण्याचा निर्णय घेतला.


रिझवानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने २० वनडे सामने खेळले, ज्यात ९ जिंकले आणि ११ गमावले. शाहीन आफ्रिदीची नियुक्ती व्हाईट-बॉल हेड कोच माईक हेसन आणि निवड समितीच्या बैठकीनंतर करण्यात आली आहे.



शाहीन आफ्रिदीवर पुन्हा विश्वास


शाहीन शाह आफ्रिदी याला यापूर्वीही टी-२० संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते, परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत पराभव झाल्यानंतर त्याला पदावरून हटवण्यात आले होते. आता त्याला पुन्हा एकदा वनडे संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. शाहीन आफ्रिदीनोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत कर्णधार म्हणून पहिल्यांदा जबाबदारी स्वीकारेल.


Comments
Add Comment

सलग तीन पराभवानंतरही भारताच्या आशा कायम, सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी हा आहे रस्ता

इंदूर: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये यजमान भारताला रविवारी इंग्लंडविरुद्धच्या थरारक सामन्यात अवघ्या ४

IND vs ENG: इंग्लंडने भारताच्या विजयाचा घास हिरावला, वर्ल्डकपमध्ये सलग तिसरा पराभव

इंदोर: इंदोरच्या मैदानावर आज भारतीय महिला संघाला इंग्लंडच्या महिला संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला.

कसोटी क्रिेकेटमधून निवृत्तीनंतर लंडनमध्येच राहण्याच्या निर्णयावर कोहलीने सोडले मौन

कॅनबेरा : भारतीय संघाचा फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर लंडनमध्येच का राहण्याचा

पर्थमध्ये झाला अनर्थ, भारताचा पहिल्याच सामन्यात पराभव; पावसाचा व्यत्यय आणि स्टार फलंदाजांचा फ्लॉप शो चर्चेत

पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे झाला. हा सामना

IND vs AUS: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस, घेतला गोलंदाजीचा निर्णय

पर्थ: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस जिंकला आहे. त्यांनी

स्मृती मानधना लवकरच 'इंदूरची सून' होणार! प्रियकर पलाश मुच्छलने भर कार्यक्रमात दिली लग्नाची कबुली

मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामीवीर आणि 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाणारी स्मृती मानधना लवकरच